Lokmat Agro >शेतशिवार > जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

The rebirth of nature begins with the arrival of fungi in the forest; Read supernatural nature stories | जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

Nature Birth Story : पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पून्हा एकदा रंग, सुगंध आणि जैवविविधतेने खुलली आहे. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी, पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशी (Fungi) यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Nature Birth Story : पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पून्हा एकदा रंग, सुगंध आणि जैवविविधतेने खुलली आहे. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी, पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशी (Fungi) यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आर. एस. लाड

पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पून्हा एकदा रंग, सुगंध आणि जैवविविधतेने खुलली आहे. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी, पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशी (Fungi) यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

सुकलेल्या पानांचं, लाकडांचं आणि इतर जैविक कचन्याचं विघटन करणाऱ्या या सूक्ष्मजीवांमुळे निसर्गाची पुनर्रचना सुरू होते. ही बुरशी म्हणजे निसर्गाकडून निसर्गाचंच संरक्षण करणारी व्यवस्था आहे.

बुरशीच्या प्रजाती केवळ जैतिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पर्यावरणीय आणि औषधीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मौल्यवान आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे जमिनीची सुपीकता वाढते, झाडांची मुळे पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषू शकतात आणि संपूर्ण अरण्याचा आरोग्यदायी समतोल राखतो, असे पर्यावरण अभ्यासक नीलेश माने यांनी बुरशीचे महत्त्व स्पष्ट केले.

निसर्गस्नेही बुरशीचे कार्य

•  बुरशींचं सर्वात मूलभूत कार्य म्हणाजे विघटन (decomposition). वनात गळून पडलेली पानं, कुजलेलं लाकूड, मृत प्राणी आणि इतर जैविक पदार्थ यांचं विघटन करून बुश्शी कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर खनिज पदार्थ नातीला परत देतात. त्यामुळे जमिनीची गुणकता सुधारते आणि नवीन वनस्पतींना पोषण मिळते.

• याशिवाय, बुरशी वनस्पतींसोबत मायकोरायझल संबंध प्रस्थापित करून त्यांना अधिक पाणी आणि खनिजे मिळवून देतात, त्यामुळे झाडं अधिक तगधारक होतात आणि दुष्काळ किंवा रोगराईला तोंड देण्याची त्यांची क्षमता वाढते.

कृषी व औषध क्षेत्रात योगदान

• कृषी क्षेत्रात बुरशीचा उपयोग काढतच आहे. जैविक शेतीमध्ये मायकोराय‌झा बुरशी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून पिकांची उत्पादकता वाढवते. याशिवाय, Trichoderma व Beauveria यांसारख्या बुरशींचा उपयोग नैसर्गिक कीटकनाशक म्हणून होतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या वापरात कपात होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो.

• मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशीचे योगदान अनमोल आहे. Penicillium या बुरशीपासून मिळालेलं पेनिसिलिन है मानवाच्या आरोग्यातील क्रांतिकारक औषध ठरलं. याशिवाय, Aspergillus, Tolypocladium, इ. बुरशींपासून इम्युनोसप्रेसट्स, स्टॅटिन्स, अँटीफंगल्स आणि सायकोअॅक्टिव्ह औषधे तयार केली जात आहेत.

जर बुरशी नष्ट झाली तर ?

• पर्यावरणातून पर्यावरणातून बुरशी नष्ट झाली, तर संपूर्ण पारिस्थितिक तंत्रच बासलेन मृत जैविक पदार्थ विघटित होणार नाहीत, त्यामुळे पोषक घटक जमिनीपर्यंत पोहोचणार नाहीत, वनस्पती मरू लागतील, अन्नसाखळी तुटेल, औषधांचा तुटवडा निर्माण होईन आणि जैवविविधता नष्ट होईल.

• तसेच बुरशींच्या अनुपस्थितीत जमिनीची बांधणी होणार नाही, जलसंधारण क्षमतेत घट होईल आणि हवामान बदलाचे प्रमाण वाढेल. हे दृश्थ केवल विज्ञान कल्पनांपुरते मर्यादित न राहता खरोखरच संभव आहे.

• पर्यावरण अभ्यासक नीलेश माने (कोपार्डे) आणि डॉ. पांडुरंग बागम (मानोनी) यांनी येथील अंबेश्वर देवराई व घाट क्षेत्रात नुकोकोपरीनस, अंगरिकस, मायसेना, पूलुटस, लेनिनस आणि ट्रम्पपैंट यांसारख्या दुर्मीळ बुरशी प्रजातींच्या नोंदी मिळविल्या आहेत.

संवर्धनाची गरज

"अंबेश्वर देवसईतील जैवविविधता केवळ  पर्यावरणासाठी नाही, तर इथल्या स्थानिक पर्यटनालाही नवा आयाम देऊ शकते. ही संपत्ती जपण्याचं भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे, असे पर्यटन सल्लागार अजिंक्य बेर्डे म्हणतात. देवराया जशा CTR धार्मिक आस्था जोपासतात, तशाच त्या निसर्गसंवर्धनाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, अभ्यासक आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन अशा ठिकाणांचा संरक्षण आराखडा तयार करणे आवश्यक आहे.

निसर्गसाक्षरतेकडे वाटचाल

आंबा-विशाळगड जंगल, अंबेश्वर देवराई परिसरात पर्यावरण अभ्यासक नीलेश माने व डॉ. बागम यांनी बुरशीवर संशोधन केले आहे. यावर आधारित स्थानिक शाळा, महाविद्यालये, पर्यावरण गटांनी मोहीम राबवून बुरशी संवर्धनाविषयी अनजागृती करणे, फंगल वॉक, मायकोलॉजी वर्कशॉप आणि स्थानिक भाषेतील माहिती पुस्तकांचे प्रकाशन हे पुढील टप्पे असू शकतील.

(बुरशी ही केवळ सहणारी वस्तू नाही, तर पृथ्वीच्या पुनर्निर्मितीची सुत्रधार आहे. अंबेश्वर देवराईसारख्या ठिकाणी या जैविक शिल्पकारांचं अस्तित्व अपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे)

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Web Title: The rebirth of nature begins with the arrival of fungi in the forest; Read supernatural nature stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.