राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर १६८ रेशीम अंडीपालन केंद्रे (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत.
या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने रेशीम अंडी उबविणे, कोषाचे संगोपन करणे, त्यातून धागा काढण्याची प्रक्रिया इत्यादी बाबींमध्ये मार्गदर्शन मिळते.
रेशीम शेतीच्या उत्पादन प्रक्रियेत अंडीपुंज ही प्राथमिक आणि महत्त्वाची पायरी आहे आणि ती आता सहज उपलब्ध होऊ लागली आहे. राज्यात रेशीम कोष उत्पादनातही वाढ झाली असून, एकूण ४,०१० मेट्रिक टन कोष उत्पादन नोंदविण्यात आले आहे.
अंडीपुंज वाटपात लक्षणीय वाढ
• राज्यातील चॉकी केंद्रांच्या कामकाजामुळे अंडीपुंज वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ६० लाख ८ हजार अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले.
• २०२२-२३ मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान २८ लाख ३७ हजार अंडीपुंज, तर वर्षभरात एकूण ५१ लाख ४० हजार अंडीपुंजांचे वितरण झाले होते. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढत असून, शाश्वत उत्पन्नाचा एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.
विभागनिहाय कोष उत्पादन
छत्रपती संभाजीनगर विभाग - २,३२५ मे. टन
पुणे विभाग - १,३०१ मे. टन
अमरावती विभाग - ३२७.६४२ मे. टन
नागपूर विभाग - ५६.२८६ मे. टन
हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती