केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे.
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे.
पीक कापणी अहवाल आल्यानंतर मर्यादा ठरविली जाणार असून ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करावी.
पाहणी अहवाल गरजेचा
शासकीय योजनेंतर्गत खरेदी केले जाणारे धान्य तसेच कापूस यासाठी ई-पीक पाहणी अहवाल आवश्यक असतो; परंतु अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून दुर्लक्ष करतात. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी.
काय होणार खरेदी?
मूग, उडीद, सोयाबीन व तूर इ.
विक्री करण्यासाठी काय आवश्यक?
ई-पीक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे.
खरेदी प्रक्रिया ऑनलाइन
ही खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.
जाहीर केलेला हमीभाव (एमएसपी)
तूर - ८,०००
मूग - ८,७६८
उडीद - ७,८००
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार