VBG RAMJI Scheme : केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेऐवजी (MGNREGA) नवीन विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियान (VBG RAMJI Scheme) लागू करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून देशभर सुरू होणार आहे.(VBG RAMJI Scheme)
त्यामुळे सध्या सुरू असलेली मनरेगा अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना रोहयो विभागाला देण्यात आल्या आहेत.(VBG RAMJI Scheme)
नवीन योजना लागू होण्यापूर्वी मंजूर झालेली सर्व कामे जुन्या निकषांनुसारच पूर्ण केली जाणार आहेत. मात्र नवीन कामांना एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात ६९ हजारांहून अधिक कामे सुरू
यवतमाळ जिल्ह्यात सध्या मनरेगा अंतर्गत तब्बल ६९,२५० कामे सुरू आहेत.
त्यामध्ये ४४,८३७ घरकुलांची कामे
१२,००० सिंचन विहिरी
५,७८० फळबाग प्रकल्प
१,५०० गोठे बांधकाम
तसेच रस्ते व इतर विकासकामांचा समावेश आहे.
ही सर्व कामे एप्रिलपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
नवीन योजनेतून पुढील कामे
एप्रिलपासून लागू होणाऱ्या 'व्हीबीजी रामजी' योजनेतूनच नवीन कामांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे सध्या मंजूर लाभार्थ्यांना नवीन कामांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मजुरांसाठी दिलासा
दरवर्षीप्रमाणे मनरेगा मजुरांच्या मजुरीत एप्रिल महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजुरांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
नवीन योजनेत काही संरचनात्मक बदल करण्यात आले असून रोजगार संधी वाढण्याचे संकेतही मिळत आहेत.
