Lokmat Agro >शेतशिवार > River Linking Project : नदीजोड प्रकल्प व्यवहार्य; मराठवाड्याला मिळणार 'इतके' टीएमसी पाणी

River Linking Project : नदीजोड प्रकल्प व्यवहार्य; मराठवाड्याला मिळणार 'इतके' टीएमसी पाणी

latest news River Linking Project: River linking project feasible; Marathwada will get 'this much' TMC water | River Linking Project : नदीजोड प्रकल्प व्यवहार्य; मराठवाड्याला मिळणार 'इतके' टीएमसी पाणी

River Linking Project : नदीजोड प्रकल्प व्यवहार्य; मराठवाड्याला मिळणार 'इतके' टीएमसी पाणी

River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्बल २५ टीएमसी पाणी मिळणार असून सुमारे १ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. (River Linking Project)

River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्बल २५ टीएमसी पाणी मिळणार असून सुमारे १ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. (River Linking Project)

शेअर :

Join us
Join usNext

बापू सोळुंके 

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना राबविणे व्यवहार्य असल्याचा सर्वेक्षण अहवाल नुकताच राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. (River Linking Project)

या योजनेमुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सुमारे १ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.(River Linking Project)

काय आहे नदीजोड योजना?

धाराशिव आणि बीड हे जिल्हे कृष्णा खोऱ्यात येतात. कृष्णा खोऱ्यातील २३.६६ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय यापूर्वी राज्य सरकारने घेतला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ ७ टीएमसी पाणीच मिळाल्याने मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती कायम राहिली.

या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाळ्यात वाहून जाणारे कृष्णा-भीमा नद्यांचे पाणी उजनी धरणात आणून ते मराठवाड्याला वळविण्याची मागणी होत होती. यासाठी शासनाने जलसंपदा विभागाकडून व्यवहार्यता अहवाल मागवला होता. आता या सर्वेक्षणाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पुढील प्रक्रिया

अहवालानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार.

शासनाची मंजुरी मिळाल्यावर निविदा प्रक्रिया राबवली जाईल.

प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज आहे.

जलतज्ज्ञ काय सांगतात?

या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भागांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल, असे जलअभ्यासक जयसिंह हिरे यांनी सांगितले.

हे ही वाचा सविस्तर : Krishna River Project : कृष्णेचे पाणी कधी येणार? टप्पा ६ची निविदा प्रक्रियाच सुरू नाही वाचा सविस्तर

Web Title: latest news River Linking Project: River linking project feasible; Marathwada will get 'this much' TMC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.