Mosambi Crop Damage : अवकाळी पावसाच्या (Unseasonal rains) तडाख्याने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे संकट अधिक गडद झाले आहे. २९ हजार हेक्टर क्षेत्रावरील बहर धोक्यात आला आहे. (Mosambi Crop Damage)
लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास 'जीआय' (GI) मानांकनासह मोसंबीची ओळखही धोक्यात येईल. (Mosambi Crop Damage)
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा एकदा निसर्गाचा घाला पडला आहे. पूर्वमान्सून (Pre-Monsoon) पावसाच्या अनियमिततेमुळे मोसंबीच्या झाडांना अपेक्षित 'मृगबहार' येण्यात अडथळा निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.
जिल्ह्यात सुमारे २९ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड होते. यामध्ये अंबड तालुका ९ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रासह आघाडीवर आहे.(Mosambi Crop Damage)
मृगबहार हा मोसंबीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. जून-जुलैमध्ये झाडावर बहर येतो आणि पुढे उत्पादन प्रक्रिया सुरू होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे बहर फुटण्यास विलंब होत असून अनेक बागांमध्ये बहरच न फुटल्याचे दिसत आहे. त्यात अंबे बहरही मागील काही वर्षांपासून अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांचा मोसंबीवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे. (Mosambi Crop Damage)
तालुकानिहाय आकडेवारी पाहता, बदनापूर (६,६०० हेक्टर), घनसावंगी (७,६०२ हेक्टर), आणि जालना (३,०१० हेक्टर) तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर नुकसानाची शक्यता आहे. (Mosambi Crop Damage)
शेतकऱ्यांनी बागांवर सिंचन, कीडनियंत्रण, खते आदींसाठी हजारो रुपयांचा खर्च केला होता. परंतु योग्य हवामान अभावी तो खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.(Mosambi Crop Damage)
जिल्हा मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जालना मोसंबीला 'जीआय' मानांकन मिळाले असतानाही तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी धोरणात्मक पातळीवर हस्तक्षेपाची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी तर बागा उपटण्यासाठी जेसीबी वापरण्यास सुरुवात केली आहे, हे वास्तव अत्यंत गंभीर आहे.
अंबे आणि मृग बहरावर संकट
मोसंबीला वर्षभरामध्ये जून ते जुलैमध्ये मृग बहार येतो. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये अंबे बहार फुटतो. कधी-कधी जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यास मोसंबीच्या झाडावर बहर येतो. त्याला अडकन बहर असे सुद्धा म्हणतात.
मात्र, भरवशाचा असणारा आंबे बहर वारंवार धोक्यात सापडत असल्याने शेतकरी मृग बहाराकडेही वळले होते. यावर्षी मात्र दोन्ही बहर संकटात सापडले आहेत. यामुळे मोसंबी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
मागील काही वर्षांपासून मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावर्षी अनेक मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांनी बागांवर जेसीबी फिरवला आहे. 'जीआय' मानांकन प्राप्त मोसंबीची जिल्ह्यातील ओळख कायम ठेवायची असल्यास शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज आहे. - भगवान डोंगरे, अध्यक्ष, जिल्हा मोसंबी उत्पादक संघ, जालना