Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada Crop Damage : मराठवाड्यात तीन महिन्यांत अतिवृष्टीने १,४१८ कोटींचे नुकसान; पंचनामे कधी? वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात तीन महिन्यांत अतिवृष्टीने १,४१८ कोटींचे नुकसान; पंचनामे कधी? वाचा सविस्तर

latest news Marathwada Crop Damage: Heavy rains in Marathwada in three months cause loss of Rs 1,418 crore; When will the Panchnama be done? Read in detail | Marathwada Crop Damage : मराठवाड्यात तीन महिन्यांत अतिवृष्टीने १,४१८ कोटींचे नुकसान; पंचनामे कधी? वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात तीन महिन्यांत अतिवृष्टीने १,४१८ कोटींचे नुकसान; पंचनामे कधी? वाचा सविस्तर

Marathawada Crop Damage : मराठवाड्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शासनाने ६३० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसानभरपाई व शासन योजनांचा लाभ मिळणार नाही. (Marathawada Crop Damage)

Marathawada Crop Damage : मराठवाड्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शासनाने ६३० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसानभरपाई व शासन योजनांचा लाभ मिळणार नाही. (Marathawada Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

विकास राऊत

मराठवाड्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीशेतीस मोठा फटका बसला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, या कालावधीत १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यातील सुमारे ५० टक्के म्हणजे ६३० कोटी रुपयांची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केली आहे.(Marathawada Crop Damage)

सध्या काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा नफा किंवा नुकसानीचे अचूक आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. याशिवाय, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हेही ठरलेले नाही.(Marathawada Crop Damage)

तीन महिन्यांतील नुकसान व भरपाईचा आढावा

महिनानुकसान (कोटी)भरपाई (कोटी)मागणी (कोटी)
जून१४१४११,११५
जुलै५१५१८७,५१२
ऑगस्ट१३५२६३०१९,६००००
सप्टेंबरपंचनामे सुरू

सुमारे ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी या अतिवृष्टीने प्रभावित झाले आहेत.

शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडथळे

पीक नोंदणी आणि ई-पीक पाहणी: अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही, सर्व्हर डाउन असणे, जमिनीचे लोकेशन चुकीचे दिसणे.

बँक खाते लिंक नसणे: नुकसानभरपाई मिळवण्यासाठी आधार-बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.

पंचनामा प्रक्रिया विलंब: नैसर्गिक आपत्ती नंतर मदत वितरण विलंबामुळे शेतकऱ्यांना अडचण.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी ई-पीक पाहणीसाठी मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, मुदतवाढीमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी पूर्ण करून नुकसानभरपाईसाठी अर्ज करू शकतील. शासनाला जलद पंचनामे प्रक्रिया व निधी वितरण सुनिश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : रानभाजीची क्रांती: सुमनबाईंच्या'कर्टुले' लागवडीने दिला शेतकऱ्यांना नवा मार्ग वाचा सविस्तर

Web Title: latest news Marathwada Crop Damage: Heavy rains in Marathwada in three months cause loss of Rs 1,418 crore; When will the Panchnama be done? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.