Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada Crop Damage : अतिवृष्टीचा फटका : मराठवाड्यात ५०% खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : अतिवृष्टीचा फटका : मराठवाड्यात ५०% खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

latest news Marathwada Crop Damage: Heavy rains hit: 50% of Kharif crops in Marathwada are muddy Read in detail | Marathwada Crop Damage : अतिवृष्टीचा फटका : मराठवाड्यात ५०% खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : अतिवृष्टीचा फटका : मराठवाड्यात ५०% खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात गेल्या १० दिवसांत आलेल्या वारंवार अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिके नष्ट झाली असून, म्हणजेच अर्ध्या पिकांचा चिखल झाला आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आणि आगामी काळातील महागाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Marathwada Crop Damage)

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात गेल्या १० दिवसांत आलेल्या वारंवार अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिके नष्ट झाली असून, म्हणजेच अर्ध्या पिकांचा चिखल झाला आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आणि आगामी काळातील महागाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Marathwada Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Crop Damage : गेल्या दहा दिवसांत मराठवाड्यात अनेक भागांत वारंवार आलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा संकट आले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, म्हणजेच ५० टक्के पिकांचा चिखल झाला आहे. (Marathwada Crop Damage)

या स्थितीमुळे खरीप कृषी उत्पादनात घट होणार असून, आगामी काळात महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Marathwada Crop Damage)

नुकसानीची व्यापक परिस्थिती

नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत ७६ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पंचनाम्यांना वेग आलेला नाही. शेतांमध्ये पाणी ओसरत नसल्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया मंदावलेली आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक संकट

पेरणीसाठी बँकांकडून अपेक्षित पीक कर्ज पुरवले गेलेले नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी बियाणे उधारीवर किंवा सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती. आता पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बियाण्याचे कर्ज, सावकारांचे देणे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पुराचा तडाखा

अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे ८६ जणांचा मृत्यू आणि १७२५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे अनेक भागांमध्ये शेती वाहून गेली असून, त्यामुळे शेतकरी आणि गावकरी दोघांनाही गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे.

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान

जिल्हापेरणी क्षेत्र (हेक्टर)नुकसान क्षेत्र (हेक्टर)
छत्रपती संभाजीनगर६६०,५५२१६४,२८७
जालना६२९,०२१६०,१६७
परभणी५१२,२१६१६१,३२१
हिंगोली३४३,४१५२७३,४१३
नांदेड७५६,०५२६५४,४०१
बीड७५८,९६७४४६,१७०
लातूर५८९,०१०४०३,४३८
धाराशिव५७२,२०३२३२,९६२
एकूण४८,२१,३६६२४,९६,१५९

खरीप पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसानीमुळे डाळी, तूर, सोयाबीन यांसारख्या धान्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढेल, परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

पीक कर्ज आणि उधारीच्या परतफेडीचा प्रश्न तात्काळ सोडवणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Dam Water Level : पावसाचा परिणाम : मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली जाणून घ्या सविस्तर

Web Title : मराठवाड़ा: भारी बारिश से 50% खरीफ फसलें बर्बाद, किसान संकट में

Web Summary : मराठवाड़ा में भारी बारिश से 24 लाख हेक्टेयर में 50% खरीफ फसलें बर्बाद हो गईं। फसल ऋण वितरित नहीं होने से किसान कर्ज के बोझ तले दबे हैं। खेत जलमग्न हैं, पशुधन नष्ट हो गया है, और सर्वेक्षण कार्य धीमा है। कृषि उत्पादकता में कमी के कारण आर्थिक संकट मंडरा रहा है।

Web Title : Marathwada: Heavy Rains Ruin 50% of Kharif Crops, Farmers in Distress

Web Summary : Heavy rains in Marathwada damaged 50% of Kharif crops across 2.4 million hectares. Farmers face debt burdens as crop loans weren't disbursed. Farmlands are flooded, livestock perished, and survey work is slow. An economic crisis looms due to reduced agricultural productivity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.