Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Heat Wave Impact : उष्णतेचा शेतीवर मोठा परिणाम; शेतकऱ्यांची वेळच बदलली!

Heat Wave Impact : उष्णतेचा शेतीवर मोठा परिणाम; शेतकऱ्यांची वेळच बदलली!

latest news Heat Wave Impact: Heat has a big impact on agriculture; Farmers' time has changed! | Heat Wave Impact : उष्णतेचा शेतीवर मोठा परिणाम; शेतकऱ्यांची वेळच बदलली!

Heat Wave Impact : उष्णतेचा शेतीवर मोठा परिणाम; शेतकऱ्यांची वेळच बदलली!

Heat Wave Impact : वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिनचर्याच बदलली आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने शेतकरी आता सकाळच्या थंड वेळेतच शेतीकामे पूर्ण करत आहेत. (Heat Wave Impact)

Heat Wave Impact : वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिनचर्याच बदलली आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने शेतकरी आता सकाळच्या थंड वेळेतच शेतीकामे पूर्ण करत आहेत. (Heat Wave Impact)

Heat Wave Impact :४० अंश सेल्सिअस तापमानामुळे दुपारी शेतात काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतात गर्दी करत असून, गावात दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.(Heat Wave Impact)

राज्यात वाढत्या तापमानाचा फटका शेतीकामांवर दिसून येत आहे. सध्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या पुढील टप्पा गाठल्याने दुपारच्या वेळेत शेतात काम करणे कठीण झाले असून, शेतकरी सकाळच्या वेळेतच कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.(Heat Wave Impact)

सकाळीच शेतीकामांची लगबग

सध्या मिरची लागवडीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे शेतकरी पहाटे सकाळी ६ वाजेपासूनच कामाला सुरुवात करत असून, दुपारी ११ वाजेपर्यंत काम आटोपण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शेतात जाणे टाळले जात आहे.

उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम

वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही होत आहे.

शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)

थकवा आणि अशक्तपणा

डोकेदुखी आणि चक्कर अशा तक्रारी वाढत असून, काही शेतकरी आजारीही पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळत शेतीकामे करणे ही मोठी कसरत ठरत आहे.

दुपारी गावात शुकशुकाट

सकाळच्या वेळेत शेतात मोठी वर्दळ असली तरी दुपारच्या वेळेत गाव ओस पडलेले दिसते. बहुतांश नागरिक उन्हामुळे घरातच राहणे पसंत करत असून, रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.

मजुरांची टंचाई वाढण्याची शक्यता

उष्णतेमुळे मजुरांनाही काम करणे अवघड जात असल्याने मजुरांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामांचे नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागत आहे.

तज्ज्ञांचे आवाहन

तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना उष्णतेपासून बचावासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.

भरपूर पाणी पिणे

डोक्यावर टोपी/गमछा वापरणे

दुपारच्या वेळेत काम टाळणे

शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच काम करणे

वाढत्या तापमानामुळे शेतीची वेळच बदलली आहे. सध्या तरी सकाळच्या थंड वातावरणाचा फायदा घेत कामे पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर असून, उष्णतेचा हा वाढता तडाखा आगामी काळात शेती व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Heatwave Health Tips : उन्हामुळे शरीर ‘ड्राय’ होतंय? काय खावे-टाळावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

अधिक वाचा :Jamin Kharedi : जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो

Web Title : गर्मी की लहर से किसानों का समय बदला, खेती पर असर।

Web Summary : भीषण गर्मी के कारण महाराष्ट्र के किसान सुबह जल्दी काम करने को मजबूर हैं, जिससे स्वास्थ्य प्रभावित हो रहा है और मजदूरों की कमी हो रही है। विशेषज्ञ सावधानी बरतने की सलाह देते हैं क्योंकि कृषि चुनौतियों का सामना कर रही है।

Web Title : Heat wave drastically changes farmers' schedules, impacting agriculture.

Web Summary : Extreme heat forces Maharashtra farmers to work early, impacting health and causing labor shortages. Experts advise precautions as agriculture faces challenges.