दादासाहेब जिगे
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हनुमाननगर, आलमगाव येथील येळेकर कुटुंब हे आज शेतीत नावीन्यतेचा एक उत्तम आदर्श ठरत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी जांभळाच्या (Jamun) सेंद्रिय शेतीत यशस्वी पाय रोवले आणि आपल्या कुटुंबाला मजबूत आर्थिक आधार दिला. (Farmer Success Story)
'कोकण बहाडोली' जांभळाने बदलली शेतीची दिशा
तीन वर्षांपूर्वी दत्तात्रय त्र्यंबक येळेकर आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून आपल्या शेतात ३०० जांभळाची (Jamun) कलमे लावली. ही कलमे 'कोकण बहाडोली' (Konkan Bahadoli) जातीची असून, त्यांना कोकणातून विकत घेतले. कमी पाणी, कमी देखभाल आणि सेंद्रिय पद्धती यामुळे ही शेती कमी खर्चिक ठरली.
निव्वळ नफा देणारे पीक
शेती खर्च : अंदाजे १ लाख रुपये
उत्पन्न : आतापर्यंत ७ लाख रुपये, अजून ५ लाखांची अपेक्षा
नफा : ११ लाख रुपयांहून अधिक
विक्री दर : जालना मार्केटमध्ये २०० रुपये किलो, एका कॅरेटला ३२०० ते ३४०० रुपये मिळतोय दर
ग्राहक थेट शेतात!
येळेकर कुटुंबाच्या जांभळांना जालना बाजारात चांगला दर मिळतो आहे. विशेष म्हणजे, अनेक ग्राहक थेट त्यांच्या शेतावर येऊन खरेदी करत आहेत. यामुळे मध्यस्थांशिवाय अधिक नफा त्यांच्या हातात पडतो.
सेंद्रिय शेतीचं शक्तिस्थान बनलं आलमगाव
ही शेती रासायनिक मुक्त, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे.
जांभळासारखं औषधी गुणधर्म असलेलं फळ योग्य प्रकारे बाजारात नेल्यास स्थिर उत्पन्नाचं साधन ठरू शकतं.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान
३०० झाडांपासून लाखोंचं उत्पन्न
कमी खर्च, जास्त नफा, चांगला दर
सेंद्रिय पद्धतीमुळे टिकावू शेती
उद्योगाच्या पातळीवर जाण्याची क्षमता
'कोकण बहाडोली' जातीच्या कलमांची लागवड केली आहे. त्यास बाजारात चांगली मागणी होत आहे. यंदा सर्व झाडांवर भरपूर फळे लागली आहेत. आतापर्यंत सात लाखांचे उत्पन्न मिळाले असून, अजून पाच लाख मिळण्याची अपेक्षा आहे. - प्रल्हाद येळेकर, शेतकरी, आलमगाव