Join us

Falpik Vima Yojana : आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:24 IST

Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ही योजना राबवली जाणार असून, अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Falpik Vima Yojana)

Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. आंबिया बहार सन २०२५ साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (Falpik Vima Yojana) जाहीर करण्यात आली आहे.

डाळिंब, आंबा, पपई आणि संत्रा या चार अधिसूचित फळपिकांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे. (Falpik Vima Yojana)

वाशिम जिल्ह्यासाठी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड झाली आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळ, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणार आहे. (Falpik Vima Yojana)

कर्जदार आणि बिगरकर्जदार दोघांसाठीही संधी

या योजनेत कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. अर्ज पीएमएफबीवाय पोर्टल, बँका, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच AIDE अॅपद्वारे करता येईल.

केंद्र शासन ३० टक्के हप्ता, तर राज्य शासन ५ टक्के अतिरिक्त हप्ता उचलणार आहे. उर्वरित हप्ता शेतकरी आणि राज्य शासन प्रत्येकी ५० टक्के प्रमाणात भरणार आहेत.

एका शेतकऱ्यासाठी किमान २० गुंठे आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी आवश्यक अटी

ई-पीक पाहणी, फार्मर आयडी, आणि जिओ-टॅग केलेले फोटो बंधनकारक.

विमा संरक्षण उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहील.

अर्जासाठी कृषी कार्यालये, विमा कंपनी प्रतिनिधी आणि सेवा केंद्रांची मदत घेता येईल.

शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

फळपिक विमा योजनेचे लाभ आणि अंतिम मुदत

फळपीकनोंदणीची अंतिम मुदतनियमित विमा संरक्षणगारपीट संरक्षण
पपई३१ ऑक्टोबर २०२५४०,०००१३,०००
संत्रा३० नोव्हेंबर २०२५१,००,०००३३,०००
आंबा३१ डिसेंबर २०२५१,७०,०००५७,०००
डाळिंब१४ जानेवारी २०२६१,६०,०००५३,०००

कृषी विभागाची सूचना

हवामानातील अनिश्चिततेमुळे बागायती शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. या योजनेत सहभागी झाल्यास जोखमीपासून संरक्षण मिळू शकते. प्रत्येक शेतकऱ्याने अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी.- आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

नव्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील फळबाग शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हवामानातील जोखीम कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, शासनाकडून हप्त्याचा मोठा भार उचलल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताणही कमी होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Babool Tree Benefits : शेंगा, साल, डिंक, लाकूड… इतकी उपयुक्त बाभळी आता दुर्मीळ का? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Insurance for Farmers: Relief for Mango, Orange, Pomegranate, Papaya Growers

Web Summary : Good news for fruit farmers! The Falpik Vima Yojana offers insurance coverage for mango, orange, pomegranate, and papaya crops against weather-related losses. Farmers can register through various channels before the deadlines.
टॅग्स :शेती क्षेत्रफळेपीक विमापीकशेतकरीशेतीविदर्भमराठवाडा