Lokmat Agro >शेतशिवार > सीमावर्ती भागातून बोगस बियाण्यांची घुसखोरी; नांदेडसह मराठवाड्यात काळाबाजार उघड! वाचा सविस्तर

सीमावर्ती भागातून बोगस बियाण्यांची घुसखोरी; नांदेडसह मराठवाड्यात काळाबाजार उघड! वाचा सविस्तर

Infiltration of bogus seeds from border areas; Black market exposed in Marathwada including Nanded! Read in detail | सीमावर्ती भागातून बोगस बियाण्यांची घुसखोरी; नांदेडसह मराठवाड्यात काळाबाजार उघड! वाचा सविस्तर

सीमावर्ती भागातून बोगस बियाण्यांची घुसखोरी; नांदेडसह मराठवाड्यात काळाबाजार उघड! वाचा सविस्तर

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागांतून बोगस खते व बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, हे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. वाचा सविस्तर (bogus fertilizers and seeds)

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागांतून बोगस खते व बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, हे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. वाचा सविस्तर (bogus fertilizers and seeds)

शेअर :

Join us
Join usNext

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागांतून बोगस खते व बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, हे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. (bogus fertilizers and seeds)

गुजरात, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून नोंदणीकृत नसलेली बियाणे नव्या लेबलसह विक्रीस आणली जात आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून कारवाई केवळ नावापुरतीच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि उत्पादनाचे संकट गडद झाले आहे. (bogus fertilizers and seeds)

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतून बोगस खते आणि बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत आहे. स्थानिक आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांमधील संगनमतामुळे ही बेकायदेशीर विक्री अधिकच मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. (bogus fertilizers and seeds)

नामांतर करून विक्रीचा प्रकार

नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये सध्या महाराष्ट्रात नोंदणी नसलेल्या कपाशीच्या बियाण्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, ही बियाणे गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून मोठ्या प्रमाणात आणली जात आहेत. ही बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांमार्फत नावं आणि लेबले बदलून विकली जात असून, शेतकऱ्यांना गुणवत्ता नसलेली बियाणे जबरदस्तीने खरेदी करायला लावली जात आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक आणि कृत्रिम तुटवडा

शेतकऱ्यांना योग्य ती खते-बियाणे मिळू नये, म्हणून काही व्यापारी जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत आहेत. यामध्ये DAP व युरिया खताचा तुटवडा सर्वाधिक असून, हा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचे माल मारण्यात येत आहे. 

शेतकरी विश्वास ठेवून त्याच बियाण्यांचा वापर करत असून, भविष्यात त्यातून उत्पादन न मिळाल्यास त्याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागतील.

कृषी विभागाचे भरारी पथके निष्क्रिय

या सगळ्या पार्श्वभूमीवर तालुका व जिल्हा पातळीवर १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परंतु, प्रत्यक्षात फक्त दोनच ठिकाणी कारवाई झाल्याची नोंद आहे. शिवणी व हिमायतनगर येथे काही कारवाई झाली, पण उर्वरित भागात व्यापारी मुक्तपणे बोगस बियाण्यांचा व्यापार करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाची ही पथके केवळ नावापुरती असल्याची टीका होत आहे.

दर्जाहीन बियाण्यांचे संकट कायम

मागील दोन वर्षांत तेलंगणा व आंध्र प्रदेशातून आलेल्या बोगस सोयाबीनच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यंदाही अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून कृषी विभागाने तत्काळ आणि ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

* गुजरात, तेलंगणा, आंध्र व कर्नाटकातून बोगस बियाण्यांची घुसखोरी

*  स्थानिक व्यापाऱ्यांचा सहभाग आणि नावबदलून विक्री

* कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन; पण कारवाई फक्त कागदावर

* DAP आणि युरिया खताचा तुटवडा अधिक

* गुणवत्तेहिन बियाण्यांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

हे ही वाचा सविस्तर : Hingoli Bajar Samiti: हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी; मार्केट यार्डात ३ दिवसांचा थांबा वाचा सविस्तर

Web Title: Infiltration of bogus seeds from border areas; Black market exposed in Marathwada including Nanded! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.