Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत

रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत

I received a message that Rs 30,000 had been deposited at night, but in the morning there was nothing in the account! The compensation money was returned. | रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत

रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत

कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला.

कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला.

रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जमा करणे सुरू आहे. मात्र, या मदतीचा लाभ मिळाल्याचा आनंद एका रात्रीतच विरला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बाबतीत मंगळवारी (दि. ११) घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

युवराज तोडे यांच्या नावावर एकूण आठ एकरपेक्षा जास्त शेती असून, यापूर्वी अतिवृष्टीची मदत मिळाली होती. रब्बी हंगामासाठी शासनाने हेक्टरी १० हजारांची मदत करण्याची व मर्यादा तीन हेक्टर असणार असल्याची घोषणा केली.

त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र, १२ नोव्हेंबरच्या सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर पाठविण्यात आला. ही रक्कम परत का घेतली, कारण त्यांना अद्याप कळले नाही.

याबाबत त्यांनी कृषी विभागाला माहिती दिली. यापूर्वी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी १८ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८ हजार ५०० रुपयांचीच मदत देण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून मदतीची रक्कम पुन्हा बँकेत जमा करण्याची मागणी शेतकरी युवराज तोडे यांनी केली आहे.

हेही वाचा : पाणंद रस्त्यांचा मिटलेला वाद आता पुन्हा उद्भवणार नाही! स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग फोटो बंधनकारक

Web Title : ₹30,000 जमा हुए, रातोंरात गायब: किसान की सहायता राशि खाते से गायब

Web Summary : किसान को बीज के लिए ₹30,000 की सहायता मिली, लेकिन रातोंरात निकाल ली गई। बाढ़ राहत बढ़ाने के आश्वासन के बावजूद, उन्हें कम मिला। उन्होंने जांच और पूरी राशि की बहाली की मांग की।

Web Title : ₹30,000 Credited, Vanished Overnight: Farmer's Aid Disappears in Bank Account

Web Summary : Farmer received ₹30,000 aid for seeds, only to find it withdrawn overnight. Despite prior assurances of increased flood relief, he received less. He seeks investigation and restoration of the full amount.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.