Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १.१९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी व गारपिटीचा तडाखा; अजून २ दिवस अवकाळीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:37 IST

पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला.

पुणे : राज्यात मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे २८ जिल्ह्यांतील तब्बल सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील काढणीला आलेल्या रब्बी तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, याबाबतचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला.

या पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या महत्त्वाच्या रब्बी पिकांसह कांदा, मका, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, भुईमूग, कलिंगड, पेरू, बाजरी, तीळ यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज अहवालानुसार राज्यात आतापर्यंत १ लाख १९ हजार ३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात २९ हजार ८११ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ६३२ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात २० हजार ६१३, धुळे जिल्ह्यात १४ हजार ८३१, बुलढाणा जिल्ह्यात ८ हजार ५०७, संभाजीनगर जिल्ह्यात ८ हजार ४४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

जिल्हानिहाय नुकसान (आकडेवारी हेक्टरमध्ये)

जिल्हानुकसान (हे.)
कोल्हापूर१५.९०
सातारा१५०.१०
सांगली१८६५.४२
नागपूर४१.१७
भंडारा९८.३०
चंद्रपूर१९८.३०
गोंदिया३२.५०
गडचिरोली३५७.१५
लातूर२०३.१०
नांदेड५०२.३२
धाराशिव१४०७.४०
अमरावती६९५.८६
अकोला९३०.६४
वाशिम१२०.१०
बुलढाणा८५०७.१५
यवतमाळ१९०.९०
पुणे१७८५.४०
सोलापूर२४३९.०५
अहिल्यानगर२३६३२.९०
नाशिक२९८११.७०
धुळे१४८३१.५०
नंदूरबार२९१.७६
जळगाव२०६३१.००
संभाजीनगर८४४५.१०
जालना१६९२.००

हवामान अंदाज◼️ भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसदेखील राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे आणखी नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.◼️ या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

अधिक वाचा: 'शक्तिपीठ' महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी; आता 'हे' नवीन तालुके जोडणार

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain, Hail Damage Crops; More Rain Forecasted in Maharashtra

Web Summary : Unseasonal rains and hailstorms in Maharashtra damaged crops on 1.19 lakh hectares across 28 districts. Nashik is the worst hit. Further rain is expected, causing worry for farmers. Surveys for damage assessment are underway.
टॅग्स :पीकपाऊसगारपीटशेतीशेतकरीराज्य सरकारसरकारअहिल्यानगरनाशिकरब्बीरब्बी हंगाम