Join us

Awakali Paus : खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट; नुकसानभरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:23 IST

Awakali Paus : मराठवाड्यात मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली आहे. (Awakali Paus)

Awakali Paus : मराठवाड्यात मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली आहे. (Awakali Paus)

शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाच्या तयारीला सुरुवात झाली असली, तरी भरपाई न मिळाल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे.(Awakali Paus)

विभागात अवकाळी पावसामुळे तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. २७ हजार १०३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

आठ जिल्ह्यांतील १ हजार २२७ गावांमधील तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १० हजार २२७ हेक्टरमधील बागायती, ५६५ हेक्टरमधील जिरायत क्षेत्रातील, तर ६ हजार ८५१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली असून, शेतकरी मदतीविना हताश झाला आहे. (Awakali Paus)

एप्रिल व मे महिन्यात १,०४७ गावांतील १९,८५२ शेतकऱ्यांचे १२ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यापैकी १,९७५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले. १० हजार १७६ बागायती, तर ५५९ जिरायत क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. 

जून महिन्यात १८० गावांतील ७ हजार २५१ शेतकरी बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या ४९३२.०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये ४ हजार ८७५ हेक्टर फळपिकांचे, ५१ हेक्टर बागायती, तर ५.८२ हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश आहे. विविध घटनांत आजवर ३५ जणांचा मृत्यू झाला. तर ५१ जण जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला. जालना ७, परभणी, हिंगोली प्रत्येकी २, बीड ५, लातूर ६, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अहवालात म्हटले आहे.

दोन महिन्यांत विभागात ६३० दुभती जनावरे दगावली. यामध्ये १६२ लहान दुभत्या, तर ३११ मोठ्या दुभत्या जनावरांचा समावेश आहे. तसेच ३१ लहान व १२६ मोठी ओढकाम करणारी जनावरे दगावली.

पावसाळ्याचे ११ दिवस उलटले आहेत. तरीही मराठवाड्यातील २८९ गावे, ८७ वाड्या तहानलेल्या असून, ४७० टँकरने तेथे पाणीपुरवठा सुरू आहे.  

१ हजार २४२ विहिरी प्रशासनाने उन्हाळ्यात ताब्यात घेतल्या होत्या. तो आकडा अजूनही कायम आहे. खासगी ४६१ व शासकीय ९ टँकरने विभागाची तहान सध्या भागविली जात आहे.

मराठवाड्याचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. आहे. त्या तुलनेत १ ते १७ जूनपर्यंत ८८.७ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी १७८.३ मि.मी. पाऊस झाला होता.

राजधानी तहानलेली

मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा सर्वाधिक तहानलेला आहे. १७५ गावे, २४ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.

मराठवाड्यात ४७० टँकरद्वारे पाणी

जिल्हाटँकरांची संख्यागावेवाड्या
छत्रपती संभाजीनगर२४५१६५२४
जालना१८१२३
परभणी
हिंगोली
नांदेड३२४३
बीड
लातूर
धाराशिव
एकूण४७०२८९८७

हे ही वाचा सविस्तर : Ustod Mahila Kamgar: 'आरोग्य मित्र'चा आधार! बीडमधील ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसपीकमराठवाडापाणी