राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ८०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेले ३८ हजार ३५८ शेतकरी असून त्यांच्याकडे २०९.८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्जमाफीचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. सप्टेंबर २०२५ अखेर थकीत कर्जमाफ केले जाणार आहे.
शासनाच्या महाआयटी स्तरावर पोर्टल तयार केले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून माहिती भरण्याच्या सूचना जिल्हा बँकेला दिल्या आहेत. दोन लाख थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला असून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
जिल्हा बँकेकडे २ लाख खातेदार असून त्यांनी परतफेड केलेली रक्कम पाहिली तर ८०० कोटी रुपये अनुदान मिळू शकते.
जिल्हा बँकेतील थकबाकीदार शेतकरी
| पीक कर्ज | मार्च २०२५ अखेर शेतकरी | रक्कम | सप्टेंबर २०२५ अखेर शेतकरी | रक्कम |
| २ लाखांपर्यंत | ४३,८०८ | २४०.२९ कोटी | ३८,३५८ | २०९.८९ कोटी |
| २ लाखांवरील | ३,९५० | १४९.९८ कोटी | ३,५५२ | १३६.१४ कोटी |
| एकूण कर्ज | ४७,७५८ | ३९०.२७ कोटी | ४१,९१० | ३४६.०२ कोटी |
