ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या अनेक भूमिका गाजल्या असून त्यातल्या कित्येक भूमिका नकारात्मक छटा असणाऱ्या आहेत. त्या प्रत्येक भूमिकांमध्ये त्या अगदी रोखठोक बोलणाऱ्या, कडक स्वभावाच्या अशा दिसतात. त्यांना ओळखणारे असंही म्हणतात की त्या त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही कडक स्वभावाच्याच आहेत. पण अशी बाहेरून कठोर वाटणारी व्यक्तीही एका टप्प्यावर अतिशय मृदू आणि हळवी होऊन जाते. तसंच काहीसं उषाजींच्या बाबतीतही झालं आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अभिनय क्षेत्रात १६ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल नुकतंच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यासाठी तिने पवित्र रिश्ता या तिच्या गाजलेल्या मालिकेतील ऑनस्क्रिन सासुबाई असणाऱ्या उषाजींनाही बोलावलं होतं. यादरम्यान बोलताना त्या अतिशय भावूक झाल्या आणि त्यांनी एका गोष्टीविषयी प्रचंड भीती व्यक्त केली.(Usha Nadkarni Gets Emotional In Ankita Lokhande's Party)
उषा ताई सध्या ७९ वर्षांच्या आहेत. या वयातही त्या प्रचंड ॲक्टीव्ह असून नुकत्याच एका रिॲलिटी शाेमध्येही त्या दिसल्या होत्या. त्यांचा उत्साह पाहता त्यांचं वय एवढं असेल असं जाणवतंही नाही. पण असं असलं तरी त्यांच्या मनात एक भीती मात्र कायम आहे. त्या म्हणाल्या की त्या घरात एकट्या राहतात.
टक्कल पडलेल्या भागातही उगवतील नवे केस! 'या' पानांचा रस लावा- केस गळणं थांबून जाईल
अशावेळी कधीतरी एकदम भीती वाटते की आपल्याला काही झालं आणि आपण घरात पडलो तरी कोणालाही काहीही कळणार नाही. मागच्यावर्षी त्यांच्या भावाचं निधन झालं. त्यांच्या आठवणीनेही त्यांना गलबलून आलं. त्या म्हणाल्या की आज माझा भाऊ असता तर तो मला अडचणीत पाहून धावत माझ्याकडे आला असता. पण आता मला त्याचाही आधार उरलेला नाही.
पावसाळ्यात घरात गोम, गांडूळ निघतात? ४ उपाय- गोम येण्याचा धोका कायमचा टळेल
त्यामुळे माझी अडचण सांगू तर कोणाला सांगू असं झालं आहे.. त्यांचा हा किस्सा ऐकून अंकिता, तिचा नवरा विकी जैन यांच्यासह पार्टीमध्ये उपस्थित असणारे अनेक जणही भावूक झाले.. सध्या महानगरांमध्ये राहणाऱ्या कित्येक वृद्ध लोकांची हीच कथा आहे. उषा नाडकर्णी, रविंद्र महाजनी यांच्यासारखे दिग्गज कलाकारही त्याला अपवाद नाहीत.