पार्ले - जी, भारतातील हे एक बिस्कीट असे आहे ज्याची चव अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनी चाखून पाहिली असेल. पार्ले - जी पुडा आणि चहा, याने पोट भरणारे गरीब काही कमी नाहीत. पण ते ५ रुपयांचे बिस्किटेही युद्धग्रस्त गाझा पट्टीत फारच किंमती आणि मौल्यवान म्हणून विकले जात आहे(Gaza father pays Rs 2,300 for Parle-G pack for toddler).
गेल्या दीड वर्षांपासून इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध संपण्याची चिन्हे अजूनही दिसत नाही यामुळेच या युद्धात गाझा पट्टीतील नागरिकांना मोठा फटका बसला (India's Rs 5 Parle-G Biscuit Becomes Luxury In Gaza, Packs Sold For Rs 2,400) आहे. येथील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच नुकतेच इंस्टाग्राम वरील एक व्हिडिओ पाहून नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे येथील अन्न टंचाई आणि महागाईचे चित्र समोर आल्याचे दिसत आहे(In Gaza, Parle-G Now Costs Rs 2,300 Viral Post On Kid's 'Treat' Breaks Hearts).
नेमकं झालं काय, पार्ले - जी बिस्कीट इतकं महाग का ?
युद्धामुळे गाझा येथील अन्नटंचाई आणि काळ्या बाजारामुळे या बिस्किटाची किंमत तब्बल २,३०० रुपये इतकी झाली आहे. गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलीला, रविफला तिचे आवडते बिस्किट आणून देण्यासाठी २४ युरो (सुमारे २,३४२ रुपये) मोजले. हेच बिस्कीट भारतात ५ रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतं. त्यांनी हा भावनिक क्षण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो व्हायरल झाला आणि जगभरातील नेटकऱ्यांनी हा प्रसंग पाहून हळहळ व्यक्त केली.
मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलीला हे बिस्किट आणून दिल्यावर सोशल मीडियावर संदेश लिहीत सांगितले आहे की, ‘खूप वाट पाहिल्यानंतर, मी शेवटी रविफसाठी तिचे आवडते बिस्किट आणू शकलो. किंमत १.५ युरोपासून २४ युरोपेपर्यंत वाढली असली, तरी मी तिला तिचे आवडते बिस्कीट आणून देण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.
मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर...
नेटकरी म्हणतात...
हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच, नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. जवादची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. अनेक भारतीय लोकांनी सरकारला आणि 'पारले' कंपनीला मदत करण्यासाठी टॅग केले.
या पोस्टला उत्तर देताना जवाद म्हणतो की...
जवादने या व्हायरल पोस्टला उत्तर देताना गाझामधील वास्तविक परिस्थितीवर प्रकाश टाकला. तो म्हणतो,"खूप लोकांना वाटतं की गाझामधील नागरिकांना येणारी मदत व्यवस्थितपणे वाटली जाते. पण सत्य काहीसं वेगळंच आहे. या मदतीचं वितरण चुकीच्या लोकांच्या हातात गेलं असून, अनेक ठिकाणी एजंट आणि चोरांना हे सामान लपवून ठेवून नंतर ते जास्त किमतीत विकण्यासाठी नेमलं जातं. जे लोक हे पैसे देऊ शकत नाहीत, त्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता गरजेच्या वस्तूंसाठी हिंडावं लागतं. काहीजण मोठ्या प्रमाणात चोरी करून या वस्तूंचा काळा बाजार करुन अधिक जास्त किंमतींत विकतात." गाझामधील अन्नटंचाईमुळे अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. १ किलो साखरेची किंमत ५००० रुपये आणि बटाट्याची किंमत २००० रुपये आहे. मानवी मदतीद्वारे येणाऱ्या वस्तू फक्त काही मोजक्यांपर्यंत पोहोचतात. या वस्तू मोफत येतात, पण टंचाईमुळे त्या काळ्या बाजारात उच्च किमतीला विकल्या जातात.