मातृत्व म्हणजे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर तिला मानसिक, शारिरीक आधाराची खूप गरज असते. गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर आई झाल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस खूप वेगळे असतात. या काळात शरीरात तर बदल होत असतातच, पण मानसिक स्तरावरही रोज काही ना काही वेगळ्याच घडामोडी सुरू होतात. क्षणात हळवं झाल्यासारखं होतं तर क्षणात कशाची तरी भीती वाटून येते. बाळाचा आनंद तर असतोच, पण त्यासोबत आईपणाच्या जबाबदारीचं एक मोठ्ठं ओझंही अंगावर येऊन पडलेलं असतं. म्हणूनच तर या अवस्थेतल्या महिलांची खूप काळजी घेणं गरजेचं असतं.
आईला आपल्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करता यावं, स्वत:च्या तब्येतीचीही काळजी घेता यावी यासाठी महिलांना ६ महिन्यांपर्यंतची मॅटर्निटी लिव्ह मिळते. पण अविवाहित महिलांच्या बाबतीत नेमका काय नियम आहे, याविषयीचा निर्णय २८ जून १९८६ साली घेण्यात आला.
कैरीच्या लोणच्याला बुरशी आली? ३ उपाय लगेचच करा, लोणचं वाया जाणार नाही- चवही चांगली राहील
या दिवसापर्यंत असं होतं की मातृत्व रजेचा लाभ फक्त विवाहित महिलांसाठीच आहे, अशी लोकांची ठाम समजूत होती. कारण त्यावेळी मातृत्व रजा घेणारी महिला विवाहितच आहे, असं समजलं जायचं. पण १९८६ नंतर मात्र मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की हा मातृत्व रजेचा लाभ घेणारी महिला विवाहित आहे की अविवाहित आहे, असं काेणताही भेदभाव केला जाणार नसून प्रत्येकीला समान न्याय मिळेल.
या स्पष्टतेतून सामाजिक विचारसरणीत बदल करण्याचा मोठा प्रयत्न केला गेला आणि अविवाहित महिलांनाही हक्काने हा लाभ घेता आला.
तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ
कारण शेवटी या दिवसांत महिलांची आणि त्यांच्या बाळाची काळजी हा प्रमुख विषय असतो आणि त्याचा महिलांच्या विवाहित किंवा अविवाहित असण्याशी काहीही संबंध नसतो.. म्हणूनच आजचा दिवस मातृत्व रजा कधी ना कधी घेतलेल्या किंवा इथून पुढेही घेणाऱ्या महिलांसाठी नेहमीच खास असणार आहे.