Join us

पावसाळ्यात घरात कुबट-दमट वास येतो? ५ उपाय- घरात वाटेल प्रसन्न रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 10:17 IST

1 / 7
पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु पावसामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून वास येतो. आर्द्रता वाढल्याने भिंती ओल्या होतात आणि ओलसरपणा घरात पसरतो, ज्यामुळे कुबट-दमट वास येऊ लागतो.(monsoon home freshness tips)
2 / 7
कपडे घरात वाळत असतील तर घरात यामुळे देखील वास पसरतो. या वासात राहण्याऐवजी घराला सुगंधित करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरु शकता. (how to remove musty smell in rainy season)
3 / 7
घरातील ओलावा कमी करण्यासाठी स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोरड्या कापडाने घर स्वच्छ करा. जमिनीवर पाणी साचू देऊ नका.
4 / 7
घरात ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवा. कचऱ्यामुळे कुबट वास येतो. तसेच कचरा जास्त वेळ घरात ठेवू नका. तसेच स्वयंपाकघरात ओला कापड ठेवू नका.
5 / 7
दुर्गंधी कमी करण्यासाठी घरात कापूर जाळा यामुळे घरात बुरशी लागणार नाही. तसेच घरातील दमटपणा कमी होईल.
6 / 7
अनेकदा पाऊस नसला तरी वातावरणात ऊन पसरते. अशावेळी घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवा. ज्यामुळे घरात हवा खेळती राहिल.
7 / 7
कडुलिंबाचे अँटीफंगल गुणधर्म आहेत. जे घरातील दमटपणा-बुरशीजन्य गोष्टी लांब ठेवतात. कडुलिंबाची पाने कापडात बांधून घराच्या कोपऱ्यात ठेवा.
टॅग्स : सोशल व्हायरलमोसमी पाऊस