तुम्ही देशाचा गौरव वाढवला! ‘पद्म’ पुरस्कार देऊन देशानं केला गुणी महिलांचा सन्मान, पाहा त्या कोण?
Updated:May 28, 2025 18:39 IST2025-05-28T18:33:13+5:302025-05-28T18:39:14+5:30
You have enhanced the pride of the country! The country has honored talented women by giving them the 'Padma' award, see who they are? २०२५ मधील पद्म पुरस्कार मिळालेल्या भारत कन्या कोण आहेत पाहा. देशाला त्यांचा अभिमान आहे.

२०२५ मध्ये भारत सरकारने दिलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये दरवर्षी प्रमाणेच काही कर्तृत्त्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. कला, साहित्य, तंत्रज्ञान, सेवा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
९४ वर्षीय कुमुदिनी लाखिया यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्म विभूषण देण्यात आला. त्या कथक नृत्यांगना असून जगभरात कथकचा प्रचार करण्यासाठी ओळखल्या जातात.
बिहारच्या लोकगीतांची जपणूक करण्यासाठी शारदा सिन्हा यांना पद्म विभूषण देण्यात आला. त्यांना बिहार कोकिळा असे म्हटले जाते. मैथिली, भोजपुरी, मागधी या भाषांमध्ये त्या गातात.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या समाजसेविका साध्वी ऋतम्भरा यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या अध्यात्मिक मार्गदर्शनही करतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम महिला चेअरमन ठरलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांना पद्म श्री देण्यात आला. त्या महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. भारतातील चांगल्यातल्या चांगल्या बँकरपैकी एक आहेत.
शास्त्रीय संगीतात मोठे योगदान देणाऱ्या अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म श्री हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी शंभरपेक्षा जास्त बंदिश तयार केल्या आहेत.
कॅन्सरच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कार्यरत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ नीरजा भटला यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार देण्यात आला.
सॅली होळकर या अमेरीकेत जन्मलेल्या भारतीय कला संरक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. महेश्वरी साडीचे संगोपन करत त्यांने अनेक महिलांना रोजगाराची संधी दिली. त्यांना पद्म श्री देण्यात आला.
ममता शंकर या बंगालमधील एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील कार्यासाठी पद्म श्री देण्यात आला.
जसपिंदर नरुला या पंजाबी लोकगीत गायिकेला कला क्षेत्रातील पद्म श्री हा पुरस्कार देण्यात आला. पारंपारिक गाण्यांचे जतन करण्यात त्यांचे योगदान आहे.