पावसाळ्यात डाळी - कडधान्य खराब होतात? डब्यात ठेवा ७ पदार्थ- अळ्या-किडे-बुरशीचा त्रास नाही...
Updated:June 24, 2025 17:26 IST2025-06-24T17:14:13+5:302025-06-24T17:26:14+5:30
Try These 8 Easy Ways to Prevent Bugs in Dry Dal and Lentils During the Rainy Season : Smart Ways to Keep Bugs Away from Dry Dal and Lentils This Rainy Season : Keep Your Dal and Lentils Bug-Free During the Monsoon – Try These Simple Methods : Try These Tips to Prevent Bugs in Dry Dal and Lentils : वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या डाळी - कडधान्य पावसाळ्यात सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स...

पावसाळा सुरू झाला की हवेत आर्द्रता वाढते आणि त्याचा थेट परिणाम घरात साठवलेल्या सुक्या डाळी, कडधान्यांवर (Try These 8 Easy Ways to Prevent Bugs in Dry Dal and Lentils During the Rainy Season) होतो. वेळीच योग्य काळजी न घेतल्यास यावर डाळी, धन्यांना बुरशी येणं, दुर्गंधी येणं किंवा कीड लागून खराब होणं अशा समस्या येतात. यासाठीच, स्वयंपाकघरातील साठवून ठेवलेल्या डाळी - कडधान्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या व उपयुक्त टिप्स पाहूयात( Try These Tips to Prevent Bugs in Dry Dal and Lentils).
१. हवाबंद डब्यांचा वापर करा :-
डाळी-कडधान्य काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यांमध्ये भरून ठेवा, त्यामुळे बाहेरून येणारी ओलसर हवा आत जाणार नाही. यामुळे पावसाळ्यात देखील डाळी - कडधान्य खराब न होता चांगली टिकून राहतात.
२. कडुलिंबाची पाने व तमालपत्र :-
साठवून ठेवलेल्या डाळी व कडधान्यांच्या डब्यांत सुकलेली कडुलिंबाची पाने व तमालपत्र घालून ठेवावे. ही दोन्ही पाने नैसर्गिक कीटकनाशकासारखं काम करतं यामुळे डाळी - कडधान्य खराब न होता सुरक्षित राहतात. यामुळे डाळी - कडधान्यांना कीड लागत नाही.
३. लाल सुक्या मिरच्या :-
डाळी आणि कडधान्यांच्या डब्यात ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या घालाव्यात यामुळे धान्य व कडधान्यांना कीड लागत नाही.
४. लवंग काड्या घाला :-
डाळी व कडधान्यांच्या डब्यात ४ ते ५ लवंग काड्या घालाव्यात. यामुळे पावसाळ्यात धान्य व कडधान्यांना कीड लागून ते खराब होत नाही तसेच दीर्घकाळ चांगले टिकून राहते.
५. डब्यात बारीक मीठ घाला :-
प्रत्येक डाळी किंवा कडधान्यांच्या डब्यात थोडंसं कोरडं मीठ टाकल्यास ते ओलसरपणा शोषून घेते. या उपायांमुळे डाळींना बुरशी लागत नाही.
६. भाजून ठेवा :-
पावसाळ्यात ओलाव्याने डाळींना बुरशी - कीड लागू नये म्हणून डाळी स्टोअर करण्याआधी हलक्या कोरड्या भाजून मगच स्टोअर कराव्यात म्हणजे त्या खराब होत नाहीत.
७.हळद :-
मिठाप्रमाणेच आपण डाळी कडधान्यांच्या डब्यात चमचाभर हळद घालून ठेवू शकता. हळदीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे डाळी कडधान्य खराब होत नाहीत.
८. मोहरीचे तेल :-
कडधान्यांमध्ये आपण ३ ते ४ थेंब मोहरीच्या तेलाचे घालून, कडधान्यांना हे तेल हलकेच चोळून लावू शकता यामुळे कडधान्यांना बुरशी - कीड लागत नाही.