Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाऊ शकतो का? वरीचे तांदूळ या उपवासाला चालतात का?
Updated:February 15, 2026 10:39 IST2026-02-15T10:09:00+5:302026-02-15T10:39:40+5:30
Mahashivratri 2026 (Mahashivratrila Bhagar Chalte ka) : यात लोहाचे मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते जे उपवासात शरीराची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करते :

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026)उपवासाला भगर चालते का? या उपवासाला भगर खाऊ शकतो का असा प्रश्न सर्वांना पडतो. भगर हे कोणतेही धान्य नसून ते एका विशिष्ट प्रकारच्या गवताचे बी आहे. त्यामुळे शास्त्राप्रमाणे याला तृणधान्य न मानता फलाहार मानले जाते. (Mahashivratrila Bhagar Chalte ka)
महाशिवरात्रीला अनेकजण निर्जळी किंवा कडक उपवास करतात. अशावेळी भगर पचायला हलकी असते आणि शरीराल उर्जा देणारी असते. भगर पूर्णपणे ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पोटाचे विकार होत नाहीत. (Can Yo Eat Bhagar uring Mahashivratri Fast)
यात लोहाचे मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते जे उपवासात शरीराची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करते.
भारतीय परंपरेत उपवासाला सात्विक अन्नाचे महत्व आहे. भगरी ही तामसी नसून सात्विक मानली जाते. म्हणून पूजेच्या दिवशी आवर्जून खाल्ली जाते.
महाशिवरात्रीला भगरीची भाकरी, खिचडी किंवा आंबिल करून सेवन करण्याची प्रथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे.
भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे उपवासाच्या दिवशी ती खाल्ल्यानंतर रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि बराचवेळ भूकही लागत नाही.
भगरीमध्ये चांगल्या प्रकारचे एंटी ऑक्सिडेंट्स आणि अमिनो एसिड्स असतात जे उपवासाच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळ संतुलित राखण्यास मदत करतात.
उपवासाच्या दिवशी थकवा जाणवतो. भगरीमध्ये चांगली कर्बोदके असतात. अशावेळी भगरीचे सेवन केल्यानं बराचवेळ भूक लागत नाही आणि उत्साह टिकून राहतो.