Join us

पावसाळ्यात रातराणीला बहर येण्यासाठी करा ३ गोष्टी! मंद-धुंद सुगंधाने भरुन जाईल घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 14:58 IST

Gardening Tips For Raat Rani Plant: रातराणीचं रोप नुसतंच वाढतंय पण त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हे काही घरगुती उपाय करून पाहा..(3 tricks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant)

ठळक मुद्देरातराणीचं रोप जर तुम्हाला मोठ्या कुंडीमध्ये लावायचं असेल तर रिपॉटिंग करण्यासाठी सध्याचा पावसाळ्याचा काळ उत्तम मानला जातो.

मंद सुगंध अगदी हळूवारपणे सगळीकडे पसरवणारं सुगंधी रोप म्हणजे रातराणी.. रातराणीच्या सुगंधाने मोहित होणार नाही अशी व्यक्तीही तुरळकच असेल.. तिच्या सुगंंधामुळेच आपण ती मोठ्या हौशीने घरी आणतो. पण बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की नर्सरीतून रातराणी घरी आणल्यानंतर ती नुसतीच वाढते. तिला म्हणावा तसा बहर येतच नाही. अगदीच कधीतरी थोडी फुलं येतात. असं होत असेल तर नेमका काय उपाय करावा यासाठी या काही टिप्स.. सध्या रातराणीचा फुलण्याचा काळ आहे. त्यामुळे हा उपाय अगदी लगेचच करून पाहा..(3 home hacks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant)

 

रातराणीला भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा?

१. माती

तुमचं रातराणीचं रोप जर तुम्हाला मोठ्या कुंडीमध्ये लावायचं असेल तर रिपॉटिंग करण्यासाठी सध्याचा पावसाळ्याचा काळ उत्तम मानला जातो. रातराणीच्या कुंडीमध्ये माती भरण्यासाठी माती, खत, कोकोपीट आणि रेती यांचं प्रमाण एकसारखं ठेवावं. अशा पद्धतीच्या मातीमध्ये रातराणीची चांगली वाढ होते.

उन्हाळी सुटीनंतर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? ३ टिप्स- हसत खेळत भरपूर अभ्यास करतील

२. ऊन

रातराणीच्या रोपाली उष्णता, ऊन खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे रातराणी जर तुम्ही कुंडीमध्ये लावली असेल तर ती कुंडी ४ ते ५ तास भरपूर ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा. जर रातराणीला कमी ऊन मिळालं तर तिची वाढ खुंटते आणि फुलांचा बहरही ओसरतो.

 

३. खत

रातराणीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम अशा खताची गरज असते. त्यामुळे तुम्ही बाजारातून एनपीके खत आणून ते ही घालू शकता किंवा मग केळीची सालं वाळवून त्याचे बारीक तुकडे करा आणि ते रातराणीच्या कुंंडीतल्या मातीमध्ये खोचून ठेवा.

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा? बीटरुटचा रस घेऊन 'या' पद्धतीने लावा, त्वचा होईल स्वच्छ, उजळ

किंवा केळीची सालं, कांद्याची टरफलं आणि गूळ २ ते ३ दिवस पाण्यात भिजत घाला. नंतर ते गाळून घ्या. ते पाणी जेवढं असेल त्याच्या ३ ते ४ पट त्यात साधं पाणी मिसळा आणि हे पाणी रातराणीसकट सगळ्याच फुलझाडांना घाला. फुलझाडांसाठी हे पाणी खूप पौष्टिक ठरतं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सफुलं