आरोग्य जपण्यासाठी सलाड खाणं ही एक चांगली हेल्थ फॅशन आहे. आता अनेकांच्या ती अंगवळणीही पडली आहे. जेवणासोबत सलाड खाणं हे फायदेशीर मानलं जातं. जेवणासोबत सलाड खाल्ल्यानं पचन व्यवस्थित होतं, रक्ताची कमतरता दूर होते. शिवाय शरीरास आवश्यक जीवनसत्त्वं -खनिजं आणि फायबर सलाडमधून मिळतात.सलाड म्हटलं की सर्वात आधी नंबर लागतो काकडीचा. काकडी चिरुन किंवा तिची दही घालून कोशिंबीर करुनही खातात. अनेकजण काकडीत आणखी कच्च्या भाज्या मिसळतात. जसे गाजर आणि टोमॅटो. पण आहार तज्ज्ञ म्हणतात की काकडी आणि टमाटा एकत्र खाणं ही चुकीची सवय असून त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. कारण या दोन पदार्थाच्या एकत्र सेवनानं पोटात तयार होणारं आम्लं जास्त धोकादायक असतं.
काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:24 IST
अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. ते का?
काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?
ठळक मुद्देकाकडी टमाटा एकत्र खाल्ल्यास त्याचा परिणाम पचनक्रिया बिघडण्यावर होतो.काकडी लवकर पचते तर टमाट्याच्या बिया पचनास वेळ लागतो.काकडी टमाटा एकत्र खाल्ल्यास पोटात जास्त आम्लं अथार्त अॅसिड तयार होतं.