सौंदर्य क्षेत्रात माधुरी दीक्षित ही केवळ चाळीशी पन्नाशीच्या टप्प्यातील महिलांचीच आदर्श नाहीये. तरुण मुलीही माधुरीला आपला आदर्श मानतात आणि तिला फॉलो करतात. तिचा स्क्रीनवरचा अॅपिरिअन्स हा कधीही हेवी मेकअपचा नसतो. तिच्या चेहऱ्यावर मेकअपचे केकी थर नसतात , आजही माधुरी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच ओळखली जाते. शरीर आणि त्वचेवरचं हे सौंदर्य जपण्यासाठी माधुरी काय करत असेल असं कुतुहल सगळ्यांनाच असतं. सोशल मीडियावर वेळोवेळस वेगवेगळ्या व्हिडीओजच्या माध्यमातून माधुरी दीक्षित तिच्या फिटनेसबद्दल, त्वचेच्या काळजीबद्दल सांगत असते.त्वचा ही फ्रेश आणि निरोगी असेल तरच आपण नैसर्गिकरित्या सुंदर दिसू यावर माधुरीचा विश्वास आहे. पण अनेक कारणांमुळे कधी कधी चेहेरा थकलेला, निस्तेज दिसतो याचाही तिला अनुभव आहे. आणि अशा वेळेस केवळ मेकअपखाली चेहेरा झाकून चालत नाही हे माधुरी स्पष्ट सांगते. याबाबत आपला अनुभव शेअर करताना ती म्हणते की कुठे कार्यक्रमाला बाहेर जायचं आहे आणि त्यावेळेस आरशात बघितलं तर चेहेरा काही कार्यक्रमाला जाण्यासारखा नसतो. त्वचा थकलेली , निस्तेज दिसत असते. अशा वेळेस मी पंधरा मिनिटांची झटपट जादू माझ्या चेहेऱ्यावर करते आणि तयार होते. ही जादू खूप कामाची असल्याचंही ती सांगते.
काय आहे ही पंधरा मिनिटांची झटपट जादू?माधुरी आपल्या व्हिडीओमधे सांगते की, चेहेरा हा उदास, निस्तेज दिसत असला तर पंधरा मिनिटं स्वत:साठी काढावेत. घरात काकडी असतेच. काकडी गोल काप करुन चिरुन घ्यावी आणि मग हे काकडीचे काप गुलाबपाणी किंवा दुधात भिजत घालावेत. ते फ्रीजमधे पंधरा वीस मिनिटं ठेवावेत. तेवढ्या वेळात काकडी दुधात किंवा गुलाबपाण्यात छान भिजते . पंधरा मिनिटानंतर हे भिजवलेले काकडीचे काप काढून चेहेऱ्यावर ठेवावेत. पुढचे पंधरा मिनिटं छान डोळे मिटून बसून राहावं. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं त्वचेवर तात्काळ चमक येते. चेहेरा एकदम ताजा तवाना दिसतो. केवळ कूठे बाहेर जायचं असेल तेव्हाच हा उपाय करावा असं नाही. जेव्हा केव्हा आपल्याला आपली त्वचा ही निस्तेज दिसेल तेव्हा हा उपाय केल्यास आपल्या त्वचेला आणि ती आरशात पाहून आपल्या मनाला छान वाटतं.सौंदर्य जपायचं असेल तर माधुरी सांगते....चेहेरा हाच सौंदर्याचा घटक नसतो. आपलं शरीर , बांधा, केस यांची देखील नीट निगा राखली तर आपण खऱ्या अर्थानं सुंदर दिसतो असं माधुरी म्हणते. बाह्य उपचार करुन त्वचा तजेलदार करण्याचा मार्ग आहे पण ती नैसर्गिकरित्या तजेलदार असायाला हवी . यासाठी माधुरी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा , तेलकट आणि अति गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला देते. ज्यूस पिणं ही आजकालची फॅशन आहे. पण माधुरी ज्यूस टाळून फळं खाण्यावरच भर देते. कारण फळांमधे असलेलं फायबर ज्यूसमधे नसतं. आणि ज्यूसमधील साखर शरीर लगेच शोषून घेते, त्याचा नकारात्म्क परिणाम त्वचा आणि शरीरावर होतो. त्यामुळे ज्यूसपेक्षा फळं खा असं माधुरी सांगते. ती म्हणते फळांमुळे पोट दीर्घकाळपर्यंत भरलेलं राहातं,आरोग्यदार्यी खाण्या पिण्यासोबतच रोजचा व्यायाम हा आरोग्य, त्वचा आणि शरीराचा बांधा उत्तम ठेवण्यास आवश्यक असतो असं माधुरी म्हणते. माधुरी म्हणते की मला फिट राहायला आवडतं. पण म्हणून मी जिमवर अवलंबून राहात नाही. मी त्यासाठी तीन दिवस कथ्थक करते आणि उरलेले दोन दिवस व्यायाम करते. नृत्य किंवा व्यायाम कोणत्याही स्वरुपातील शारीरिक कृती ही फिट राहाण्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं माधुरी म्हणते.