वाढतं प्रदूषण, खाण्यापिण्यातून मिळणारे पोषणतत्वांची कमतरता, चुकीचा आहार, केमिकल्सचा अतिवापर आणि काही आजारांमुळे आपल्याला केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.(Hair care tips) केसांची योग्य काळजी घेतली नाही की, केस गळू लागतात. अनेकदा केस थोडे गळू लागले की, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.(Hair falls solution) ही समस्या इतकी वाढत जाते की, आता टक्कलच पडते की काय ही भीती वाटू लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण औषधे,केमिकल्स असणारे शाम्पूचा वापर करतो.(Food that stops hair falls) परंतु, काही घरगुती उपाय केल्यास केसगळती रोखण्यासाठी मदत होईल. आपल्या केसांसाठी जितके आयुर्वेदिक घटकांचा वापर करु तितक्या वेगाने त्यांची वाढ होते. पण केसांना फक्त आयुर्वेदिक तेल आणि केमिकल्स फ्री शाम्पूचा उपयोग करणे फायदेशीर ठरणार नाही. शरीराला योग्य आणि पुरेशा प्रमाणात पोषण तत्व मिळणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला आहारात काही बदल करायला हवा.
लिंबाच्या रसात मिसळा ३ गोष्टी, डार्क सर्कल- टॅनिंग होईल कमी, त्वचेच्या समस्या गायब-दिसाल सुंदर...
केसगळती रोखण्यासाठी अळशी, काळे तीळ, शेवग्याच्या शेंगाचा पावडर आणि आवळा पावडर फायदेशीर आहे. हे घटक आपल्याला आहारात असल्यास टाळूला पोषणतत्व मिळते. तसेच केसांच्या मुळांना बळकटी मिळते. अळशीच्या बिया अनेक वर्षांपासून केसांना बळकट करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी वापरल्या जात आहे. यामध्ये ओमेगा-३ आणि लिग्रॅन्स भरपूर प्रमाणात असतात. काळ्या तीळमध्ये झिंक आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे केस अकाली पिकण्यापासून संरक्षण होते. शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन ए, लोह आणि बायोटिनने जास्त प्रमाणात आहे. जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देते. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कोलेजन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे केस बळकट होतात.
लाडू बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप अळशीच्या बिया,१० ते १२ खजूर, अर्धा कप काळे तीळ, १ चमचा शेवग्याच्या शेंगाची पावडर आणि १ चमचा आवळा पावडर लागेल. लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अळशी आणि काळे तीळ २ ते ३ मिनिटे पॅनवर भाजून घ्या. थंड झाल्यानंतर १० ते १२ बियाविरहित खजूरांसोबत मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. यामध्ये शेवग्यांच्या शेंगाचा पावडर आणि आवळा पावडर मिसळा. याचे लाडू तयार करून हवाबंद डब्यात किंवा कोरड्या ठिकाणी ठेवा.
जर आपल्याला लाडू खायचे नसतील तर याचा पावडर तयार करुन आठवड्यातून ५ ते ६ वेळा कोमट पाण्यात १ चमचा सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे केसगळती थांबेल आणि केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.