मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे. शिवसेना-भाजपा मित्रपक्ष एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या विधानावरुन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासमोर यू- टर्न मारत अनपेक्षित उत्तर दिले.
उध्दव ठाकरे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व्हायचयं यापेक्षा आदित्य ठाकरे यांच पहिलं स्वप्न महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचं असल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाचा दावा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसमोर आता यू- टर्न घेतला आहे. तसेच महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर तुझं माझं करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विचार करुन आम्ही युती केल्याचे देखील उध्दव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार
शिवसेना- भाजपा मित्रपक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख यांना पत्रकारांकडून विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, लहान भाऊ मोठा भाऊपेक्षा भावाचं नातं काय टिकलं हे महत्वाचे आहे. तसेच आम्ही एकत्र मिळून यापुढे काम करणार आहोत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही काही गोष्टी ठरवल्या आहेत त्यानुसार मार्ग काढण्यात येणार असल्याचे देखील उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी
दरम्यान, काही जणांनी बंडखोरी केली पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहे त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही असा विश्वास आहे. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्यांची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिला. तसेच बरेच दिवस आमच्यामुळे तुम्हाला बातम्या मिळाल्या, पुढेही मिळतील, शिवसेना 124 जागा लढवित आहे, बाकी आम्ही अन् मित्रपक्ष जागा लढवतोय, त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातील महायुती प्रत्यक्षात उतरली आहे असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.