‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:32 IST2026-01-09T13:31:01+5:302026-01-09T13:32:22+5:30

Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबईमध्ये महायुती सत्तेवर आल्यास मुंबईचं पुन्हा बॉम्बे असं नामकरण होईल, असा दावा नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

BMC Election 2026: 'Even if the Mahayuti comes to power, Mumbai will not become Bombay, but if Uddhav Thackeray comes to power...', claims Nitesh Rane | ‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 

‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 

मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढत असलेल्या ठाकरे बंधूंनी भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. तसेच मुंबईतील मराठी माणसाचे हित आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईच्या अस्तित्वचं धोक्यात येईल, असा दावा ठाकरे बंधूंकडून केला जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये महायुती सत्तेवर आल्यास मुंबईचं पुन्हा बॉम्बे असं नामकरण होईल, असा दावा नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करून टाकतील, हे तर शक्यच नाही. मात्र उद्धव ठाकरे हे सत्तेत आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असा दावा नितेश राणे यांनी केला.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मात्र त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला आहे. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे, असं म्हटलं जायचं आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी आणि रोहिंगे आहेत, असं नवं समीकरण झालेलं आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून केला आहे.

उद्धव ठाकरेंचं राज्य असलेल्या मुंबईमध्ये टिस्सच्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे हे वाढत चालले आहेत. २०३० पर्यंत हा टक्का आणखीनच वाढत चाललेला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. 

Web Title : राणे: महायुति में मुंबई बॉम्बे नहीं बनेगा, उद्धव कर सकते हैं...

Web Summary : नितेश राणे का दावा है कि महायुति मुंबई का नाम बदलकर बॉम्बे नहीं करेगी, लेकिन उद्धव ठाकरे इसे 'मोहम्मद लैंड' बना सकते हैं। उन्होंने ठाकरे के शासन में बांग्लादेशी और रोहिंग्या आबादी बढ़ने का आरोप लगाया, टीआईएसएस की रिपोर्ट का हवाला देते हुए 2030 तक और वृद्धि का अनुमान लगाया।

Web Title : Rane: Mumbai won't become Bombay under Mahayuti, but Uddhav could...

Web Summary : Nitesh Rane claims Mahayuti won't rename Mumbai to Bombay, but warns Uddhav Thackeray might turn it into 'Mohammad Land'. He alleges increased Bangladeshi and Rohingya populations under Thackeray's rule, citing a TISS report projecting further growth by 2030.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.