Join us

"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:05 IST

Aaditya Thackeray on Mumbai Railway Accident: मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली.

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज (०९ जून २०२५) सकाळी अत्यंत दुर्देवी घटना घडली. लोकलमधून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १३ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली. या दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे, असे अनेक आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रावर हल्लाबोल केला.

मुंबई रेल्वे दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी या दुर्घटनेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जबाबदार असल्याचे म्हटले. ही घटना दुर्दैवी आहे, पण नवीन नाही, अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आम्हाला माहित नाही की, ते रेल्वे मंत्री की 'रील मंत्री आहेत.  रेल्वेच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नाहीत. हे दुर्दैवी आहे."

मुंबईत सकाळी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण जखमी झाली आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली. या अपघातानंतर मुबई लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच सेवेत असलेल्या सर्व लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे लावण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिला.

टॅग्स :रेल्वे अपघातआदित्य ठाकरेमहाराष्ट्रमुंबई