Join us

गोविंदाचं करिअर बरबाद करण्यामागे या चार लोकांचा हात, अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:17 IST

Bollywood Actor Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. तिने अलिकडेच गोविंदाच्या कारकिर्दीच्या घसरत्या आलेखासाठी त्याच्या काही जवळच्या लोकांना जबाबदार ठरवलं आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा(Govinda)ची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. तिने अलिकडेच गोविंदाच्या कारकिर्दीच्या घसरत्या आलेखासाठी त्याच्या काही जवळच्या लोकांना जबाबदार ठरवलं आहे. याबद्दल तिने अनेक खुलासे केले आहेत आणि तिचे मत व्यक्त केले आहे. अभिनेत्याच्या पत्नीने काय म्हटले ते जाणून घेऊयात.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने अलिकडेच द पॉवरफुल ह्युमन्सला दिलेल्या मुलाखतीत भाग घेतला होता, जिथे तिने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी तिने अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या घसरणीसाठी काही लोकांना जबाबदार धरले. ती म्हणाली की, 'गेल्या १७ वर्षांपासून गोविंदा मोठ्या पडद्यावर का दिसला नाही? कारण त्याच्या आजूबाजूचे लोक पूर्णपणे चुकीचे आहेत, ते सर्व फक्त त्याचे कौतुक करणारे लोक आहेत. गोविंदा आणि मी देखील भांडतो, कारण मी खोटे बोलू शकत नाही आणि लोकांची खुशामत करू शकत नाही. आज त्याच्याकडे एक लेखक, एक सचिव आणि एक वकील आहे, जे सर्व निरुपयोगी आहेत, कारण ते फक्त त्याची प्रशंसा करतात आणि म्हणतात की त्याने किती अप्रतिम काम केले आहे. तर जेव्हा मी सत्य बोलतो तेव्हा तो चिडतो.'

पत्नीने अभिनेत्याला दिलेला हा सल्लापुढे बोलताना गोविंदाची पत्नी म्हणाली, 'मी त्याला सांगितले होते की, ९० चे दशक संपले आहे. आज काय चालले आहे ते बघ नेटफ्लिक्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म. पण तो त्याच्या वाह-वाह प्रोडक्शन्सच्या वर्तुळात अडकला आहे. मी त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक बदलण्यास सांगितले, कारण जोपर्यंत ते चार-पाच लोक त्याच्यासोबत आहेत तोपर्यंत ते त्याला पुढे जाऊ देणार नाहीत. कोणीतरी व्यक्ती जो नव्वदच्या दशकात सातत्याने हिट सिनेमा देत होता, तो हे मानू लागला आहे की, मी सोलो-हिरो चित्रपट करेन आणि ते काम करतील. पण 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सोलो-हिरो चित्रपट नव्हता आणि 'आँखें' देखील नव्हता. त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या मनात हा समज निर्माण केला की तो एक खूप मोठा नायक आहे. पण आजकाल सोलो हिरो चित्रपट तोपर्यंत चालत नाहीत जोपर्यंत त्यात एक मजबूत विषय आणि एक चांगला दिग्दर्शक नसतो.'

वर्कफ्रंटगोविंदाने ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. हा अभिनेता शेवटचा २०१९ मध्ये सिकंदर भारती दिग्दर्शित 'रंगीला राजा' या विनोदी चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही.

टॅग्स :गोविंदा