Join us  

'रात्रीस खेळ चाले २'मध्ये शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:21 AM

'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला.

'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

शेवंता तिचं सामान घेऊन अण्णा नाईकांच्या वाड्यावर तळ ठोकायला आली आहे. माईंसमोर अण्णा आणि शेवंताचं प्रकरण उघड झाल्यावर माई मात्र तिला वाड्यात घ्यायला नकार देतात. शेवंता मात्र हार मानण्याऱ्यातली नाही आहे, ती तिकडेच पारावर बसून रात्र काढते.

आता शेवंताचं पुढचं पाऊल काय असेल? तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळेल का? माईंचा नकार असताना अण्णा तिला वाड्यात घेतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेअपूर्वा नेमळेकरझी मराठी