Join us

‘शशांक’ म्हणतोय कुठे कुठे टाकू तंबू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:19 IST

छोट्या पडद्यावरील दमदार अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेला लाडका ‘श्री’ ऊर्फ शशांक केतकर सध्या एका बिकट समस्येत सापडला आहे. ‘इथेच टाका ...

छोट्या पडद्यावरील दमदार अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेला लाडका ‘श्री’ ऊर्फ शशांक केतकर सध्या एका बिकट समस्येत सापडला आहे. ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत शशांक म्हणजेच ‘कपिल’ सध्या कुठे कुठे टाकू तंबू या चिंतेने ग्रस्त झाला आहे. केवळ कलाकारच नव्हे तर लेखक, कवी आणि राष्टय स्तरावरचा स्वीमर असलेला शशांक सध्या या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे वास्तविक जीवनात इंजिनिअर असलेल्या शशांकने आॅस्ट्रेलियात ‘एमइएम’ची (मास्टर आॅफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट) पदवी घेतली आहे, परंतु त्याची अशी गोची झाल्याने त्याची मॅनेजमेंटची पदवी कितपत फायदेशीर ठरेल हे येत्या काळात दिसेलच.  त्याचे झाले असे की, गौरी आणि कपिलचा रोमॅँटिक प्रपोज सीन सध्या प्रचंड गाजत आहे. मात्र वेळेअभावी शशांकची चांगलीच पंचाईत होत असल्याने सेटवरील सर्वच सहकलाकार त्रस्त आहेत. सध्या शशांक ‘इथेच टाका तंबू, रंगभूमीवर सुरू असलेलं नाटक, आगामी काळात सुरू होणाºया सिनेमाचं रिडिंग आणि आईच्या गावात या वेगळ्या धाटणीचं सुरू केलेलं हॉटेल’ या सर्व फेºयांमध्ये अडकला आहे. कुठल्या कामाला कोणती डेट द्यावी, वेळेचे नियोजन कसे करावे, कुठल्या कामाला प्राधान्य द्यावे, असे एक नव्हे तर अर्धाडझन प्रश्न त्याच्यासमोर दररोज उपस्थित असतात. अर्थात फिटनेसचाही प्रश्न उपस्थित होत असल्याने ‘कुठे कुठे टाकू तंबू’ असा विचार तो करीत नसेल तर नवल.