Join us  

ट्रान्सफॉर्मेशनमुळे बदललं नशीब, ४ महिन्यात २३ किलो वजन घटवून हा अभिनेता बनला टेलिव्हिजन स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 3:10 PM

एकेकाळी या अभिनेत्याचं वजन होतं ९० किलो आणि आता वजन घटवून बनला अभिनेता

छोट्या पडद्यावरील अभिनेता अतुल वर्मा सध्या फिटनेस व बॉडी बिल्डिंगमुळे प्रसिद्ध आहे. मात्र एकवेळ अशी होती जेव्हा अतुलचं वजन ९० किलो झालं होतं. फिटनेस फ्रिक असूनही इतकं वजन वाढल्यानंतर अतुल व त्याचे कुटुंब हैराण झाले होते. मात्र अतुलनं पुन्हा एकदा स्वतःला फिट केलं आहे. एका मुलाखतीत अतुलनं सांगितलं की त्याने ४ महिन्यात २३ किलो वजन कमी केलं आहे. 

अतुलनं सांगितलं की, सर्व साधारण मध्यमवर्गीय मुलासारखे मी देखील ग्रॅज्युएशन करून चांगला जॉब करायचा होता. इंजिनीयरची नोकरी करत करियरची सुरूवात केली होती. जेव्हा मी कंपनी जॉईन केली होती त्यावेळी माझं वजन ६३ ते ६४ किलो होते. 

डेल्ही टाईम्ससोबत बातचीत करताना अतुलनं सांगितलं की, आठवड्यात पाच ते सहा दिवस ८ ते ९ तासांचा जॉब करणं आणि पूर्ण दिवस बसून राहिल्यामुळे माझं वजन खूप वाढलं होतं. दोन वर्षांमध्ये माझे वजन ६३ किलोवरून ९० किलो झाले होते. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक होते.

अतुल म्हणाला की, मला पाहून माझे कुटुंबदेखील हैराण झाले होते. माझ्या कुटुंबातील लोक पाहून मला म्हणाले होते की, तुला काय झालं आहे? कारण कॉलेजच्या दिवसात मी माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देत होतो. या दिवसांत मी बॉडी बिल्डिंग चॅंम्पियनशीपचा भाग राहिलो आहे. मला गोल्ड मेडलदेखील मिळालं आहे. 

त्याने पुढे सांगितले की, मला समजू शकलं नाही की माझं वजन इतकं कसं वाढलं. याच हे कारण असू शकतं की जॉबदरम्यान मी माझ्या फिटनेसपेक्षा जास्त कामावर लक्ष देऊ लागलो होतो. एक दिवस माझ्या वडिलांनी सांगितलं की, तू हे काय करतो आहेस, मजा येत नाही. त्यानंतर मी माझी नोकरी सोडून फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. सकाळी व संध्याकाळी दोन टाईम वर्कआऊट करत होता. ९० किलोवरून ६७ किलो वजन आणण्यासाठी त्याला जवळपास ४ महिन्यांचा कालावधी लागला. 

वजन घटविल्यानंतर अतुलनं अभिनयाच्या कारकीर्दीत पदार्पण केलं. याबद्दल तो सांगतो की, फिट झाल्यानंतर मी काय करायचं असा विचार करत होतो. पुन्हा इंजिनिअरिंगचा जॉब करायचा नव्हता. मी बिझनेस व दुसऱ्या नोकरीबद्दल विचार केला. मात्र शेवटी मुंबईत येऊन टेलिव्हिजन मालिकेत काम करू लागलो.

टॅग्स :टिव्ही कलाकार