Join us  

‘तुझ्यात जीव रंगला’चा राणादाने सुरु केला नवा व्यवसाय, आता विकतोय बदाम थंडाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 12:24 PM

यायला लागतंय...चालतय की...! सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत हार्दिकने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

ठळक मुद्दे2015 मध्ये आलेल्या ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी सध्या जाम चर्चेत आहे आणि त्याचे चाहते जाम आनंदात आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपलीये, पण राणादा आता नव्या घोषणेमुळे चर्चेत आला आहे. होय, आता   हार्दिक जोशीने स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत हार्दिकने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘कोल्हापूर बदाम थंडाई’ हा देसी कोल्ड्रींक ब्रँड हार्दिक जोशी कोल्हापूरकरांच्या भेटीला घेऊन आला आहे. हा त्याचा स्वत:चा फूड ब्रँड आहे. 

‘आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केले. आता मी एका नवीन व्यवसायात पदार्पण करत आहे.या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझासोबत राहील हा मला विश्वास आहे. कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रुवारीपासून आपल्या सेवेत...मग काय येणार नव्हं? यायला लागतंय...चालतंय की...,’ या कॅप्शनसह त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

2015 मध्ये आलेल्या ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. हार्दिक जोशीने या आधीदेखील अस्मिता, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची केमिस्ट्री व प्रेमकहाणीसुद्धा त्यांना भावली होती.     हार्दिकला व्यायामाची आवड आहेच सोबतच त्याला ढोल वाजवायला देखील आवडते.    

टॅग्स :हार्दिक जोशी