Join us  

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 11:17 AM

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे

ठळक मुद्देमाझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल हा कार्यक्रम असून तुझ्यात जीव रंगला आणि तुला पाहाते रे ही मालिका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून टिआरपीच्या रेसमध्ये तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर आहे. ही मालिका इतकी लोकप्रिय असून देखील टिआरपीच्या रेसमध्ये इतकी मागे का आहे हा प्रश्न या मालिकेच्या चाहत्यांना सतत पडत होता. या मालिकेच्या फॅन्ससाठी आता एक खुशखबर आहे. ही मालिका आता टिआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे तर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

तिसऱ्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल हा कार्यक्रम असून तुझ्यात जीव रंगला आणि तुला पाहाते रे ही मालिका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून या दोन्ही मालिकांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तुला पाहाते रे या मालिकेला नुकतेच एक वळण मिळाले आहे. विक्रांत सरंजामेने इशाला लग्नाची मागणी घातली असून या मालिकेत आता या दोघांचे लवकरच लग्न होणार आहे. या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातारच्या केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा असून ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावते. त्यामुळे त्या दोघांचे लग्न कधी होणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. पुढील आठवड्यात या दोघांचे लग्न होणार असल्याने ही मालिका पुढील आठवड्यात टिआरपी रेसमध्ये अव्वल ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. 

 

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीमाझ्या नवऱ्याची बायकोतुला पाहते रेचला हवा येऊ द्यातुझ्यात जीव रंगला