Join us  

श्वेता तिवारी पुन्हा पडली प्रेमात, तिनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 1:15 PM

दोन अयशस्वी नात्यानंतर आता श्वेता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

ठळक मुद्देश्वेताने सांगितले आहे की, मी आज नव्हे तर अनेक वर्षांपासून दोन व्यक्तींच्या प्रेमात आहे. या दोन्ही व्यक्ती दुसऱ्या कोणीही नसून माझी दोन्ही मुलं आहेत. आज मी माझ्या मुलांमध्ये इतकी व्यग्र आहे की, दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडायला माझ्याकडे वेळच नाहीये.

अभिनेत्री श्वेता तिवारीने एक नाही तर दोन लग्न केली. मात्र दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. नुकतीच श्वेता पती अभिनव कोहलीपासून वेगळी झाली आहे. तिचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. राजा तिला माराहाण करत असे. त्यामुळेच तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला होता. त्यांना पलक ही मुलगी असून ती श्वेतासोबतच राहाते. 

राजासोबत घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने काही वर्षांनी अभिनव कोहलीसोबत लग्न केले. पण आता ती अभिनवपासून वेगळी झाली असून तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, अभिनव कोहली हा माझ्या आयुष्याला लागलेली एक कीड होती. त्याच्यापासून मी आता वेगळी झाल्यापासून मी खूप आनंदित आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर मला स्वतःला तंदुरूस्त असल्याचे जाणवत आहे.

दोन अयशस्वी नात्यानंतर आता श्वेता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. तिनेच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. तिने सांगितले आहे की, मी आज नव्हे तर अनेक वर्षांपासून दोन व्यक्तींच्या प्रेमात आहे. या दोन्ही व्यक्ती दुसऱ्या कोणीही नसून माझी दोन्ही मुलं आहेत. आज मी माझ्या मुलांमध्ये इतकी व्यग्र आहे की, दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडायला माझ्याकडे वेळच नाहीये. मी माझ्या मुलांसोबत प्रचंड खुश असून मला दुसऱ्या कोणाचीच गरज नाहीये. 

श्वेता आणि अभिनव यांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये विवाह केला होता. दोघांना एक मुलगादेखील आहे. श्वेता आणि अभिनव दोघांचे नाते तुटण्यामागे घरगुती हिंसाचार असल्याचे म्हटले जाते. तसेच श्वेताने सांगितले होते की, लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा विचार करणार आहे. लग्न आणि प्रेम हे दोन्ही विषय माझ्यासाठी आता पूर्णपणे संपले आहेत." 

टॅग्स :श्वेता तिवारी