Join us

'रामायण'मधील विभीषण यांचा झालेला दुर्देवी अंत, ९ वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:24 IST

'Ramayana' fame Mukesh Rawal : रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत विभीषणाची भूमिका साकारून मुकेश रावल घराघरात लोकप्रिय झाले होते.

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'रामायण' (Ramayan Serial) या लोकप्रिय मालिकेला ३८ वर्षे झाली आहेत, पण प्रेक्षक आजही त्यातील प्रत्येक पात्र आणि कलाकार विसरलेले नाहीत. आजही ही मालिका रसिकांच्या मनात घर करुन कायम आहे. मात्र, त्यातील काही कलाकार आता या जगात नाहीत. आज आम्ही तुम्हाला विभीषणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मृत्यू अत्यंत वेदनादायक झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले होते. ही भूमिका मुकेश रावल (Mukesh Rawal) यांनी साकारली होती, जे एक प्रसिद्ध टीव्ही आणि गुजराती अभिनेते होते.

विभीषण हा लंकापती रावणाचा भाऊ होता, परंतु रावणाच्या राजवटीतही तो रामाचा एक महान भक्त असल्याचे सिद्ध झाले आणि त्याच्या मदतीने भगवान राम माता सीतेला लंकेतून परत आणू शकले. विभीषणामुळेच राम रावणाचा वध करण्यात यशस्वी झाला. मुकेश रावल यांनी हे पात्र अशा प्रकारे जगले की लोक आजपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. विभीषणाच्या भूमिकेतून मुकेश रावल यांनी सर्वांच्या मनात घर केले आहे.

विभीषणच्या भूमिकेसाठी अशी झालेली निवडमुकेश रावल हे एक प्रसिद्ध रंगभूमी कलाकार होते आणि त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले होते, परंतु रामानंद सागर यांनी त्यांचे नशीब बदलले. असे म्हटले जाते की रामानंद सागर यांनी मुकेश रावल यांना रंगभूमीवर काम करताना पाहिले आणि नंतर त्यांना विभीषण बनवण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार, मुकेश रावल यांना मेघनादची भूमिका करायची होती. हे पाहून रामानंद सागर यांनी मेघनादसह विभीषणाच्या भूमिकेसाठी त्यांचे ऑडिशन घेतले. त्यांना विभीषणाचे ऑडिशन जास्त आवडले आणि त्यांची निवड झाली.

अभिनेत्याचा रेल्वे ट्रॅकवर आढळला होता मृतदेहयानंतर मुकेश रावल यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. विभीषणाच्या भूमिकेत त्यांना पाहून सर्वजण त्यांचे चाहते झाले. पण २०१६ मध्ये त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला की कळल्यानंतर सर्वांना धक्का बसला. २०१६ मध्ये मुंबईतील कांदिवली भागात रेल्वे ट्रॅकवर मुकेश रावल यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी याला अपघात नाही तर आत्महत्या म्हटले होते. एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते, ज्यामध्ये एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारताना दिसत होती. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती मुकेश रावल असल्याचे सांगण्यात आले.

अभिनेत्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबियांनी नाकारलं 'दैनिक भास्कर'च्या रिपोर्ट्सनुसार, मुकेश रावल यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, ते १५ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. तिथून ते त्यांच्या शोच्या डबिंगसाठी जाणार होते. परंतु ते तिथे पोहोचले नाहीत आणि घरी परतले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी मुकेश रावल यांच्या आत्महत्येची शक्यता नाकारली होती. 

टॅग्स :रामायण