Join us  

'आम्ही दोघी' मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 6:30 AM

 झी युवा वाहिनीवरील 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्दे शरद पोंक्षेच्या एन्ट्रीमुळे 'आम्ही दोघी'ला मिळाले रंजक वळण

 झी युवा वाहिनीवरील 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेची कथा मीरा आणि मधुरा  या एकमेकींच्या विरुद्ध  व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तरलहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतेच मालिकेत शरद पोंक्षेची एंट्री झाली आणि मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे.नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की देवाशिष, मीरा आणि दुर्वा दिवाळी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी राहायला आले आहेत. देवाशीषला मीरा आणि आदित्यच्या नात्याचे सत्य जाणून घ्यायचे असते पण त्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. मधुराचा आदित्य आणि मीरामधील मोमेंट्स बघून संताप होतो. देवाशिषला मीरा आणि आदित्यच्या नात्याबद्दल कळते आणि त्याला हेही कळते की फक्त मधुरामुळे मीरा देवाशिषशी लग्न करायचा निर्णय घेते. हे सगळे कळल्यावर देवाशिषच्या मनात मीराबद्दलचा आदर वाढतो. देवाशिष आदित्य व मीराला पुन्हा एकत्र आणणार की काय निर्णय घेणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. प्रसिद्धी किशोरने नकुशी मालिकेत काम केले आहे. आता नवीन मधुरा रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.'आम्ही दोघी' या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत.   

टॅग्स :आम्ही दोघी मालिका