Join us  

अपर्णाच्या मारेकऱ्याचा लागला शोध; संजूमुळे टळेल का ढाले-पाटलांवरचं संकट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 3:30 PM

Raja rani chi ga jodi: सूरजला फसवणाऱ्या अपर्णाचा खून झाला असून तिच्या हत्येच्या संशयाची सुई ढाले-पाटील कुटुंबाकडे जात आहे.

छोट्या पडद्यावर  तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'राजा रानीची गं जोडी'(raja rani chi ga jodi). अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. ढालेपाटील कुटुंबात दररोज नवनवीन घटना घडत आहेत. यात सूरजला फसवणाऱ्या अपर्णाचा खून झाला असून तिच्या हत्येच्या संशयाची सुई ढाले-पाटील कुटुंबाकडे जात आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला या प्रकरणातून सुखरुपपणे सोडवण्यासाठी संजू मोठ्या शर्थीने प्रयत्न करत असून तिने अपर्णाच्या खऱ्या मारेकऱ्याचा शोध लावला आहे. 

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रणजीत आईसाहेबांना अपर्णाच्या खुन्याबद्दल सांगत आहे. सोबतच  संजूने या मारेकऱ्याचा शोध लावल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. 

ज्यावेळी अपर्णाचा खून झाला त्यावेळी ढालेपाटील कुटुंबातील आईसाहेब, दादासाहेब, सूरज आणि पंजाबराव हे चौघही जण घटना स्थळावर उपस्थित होते. परंतु, या चौघांपैकी नेमका कोणी तिचा खून केला हे स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळे या चारही जणांकडे संशयाची सुई होती. परंतु, अपर्णाचा खून या चारही जणांनी केला नसून एका अन्य व्यक्तीनेच केल्याचं समोर आलं आहे.अपर्णाने पुण्यात असताना ज्या मुलाची फसवणूक केली होती. त्या आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या सख्या भावाने अपर्णाचा खून केला आहे. रणजीतने ही गोष्ट आईसाहेबांच्या कानावर घातली आहे. 

दरम्यान, या प्रकरणामुळे आता आईसाहेबांच्या मनात संजूविषयी असलेला राग निवळेल की नाही? त्या संजूला माफ करुन तिचा सून म्हणून स्वीकार करतील की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

टॅग्स :राजा रानीची गं जोडीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार