Join us  

ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली

By रूपाली मुधोळकर | Published: October 06, 2020 10:38 AM

गजेंद्र चौहान यांचा टोला, मुकेश यांना यांचे उत्तर

ठळक मुद्देआपण स्वत: ‘कपिल शर्मा शो’मध्ये गेलो नाहीत, असे मुकेश खन्ना यांनी सांगितले. पण माझ्या माहितीनुसार, त्यांना या शोमध्ये बोलवण्यात आले नव्हते, असेही गजेंद्र चौहान म्हणाले.

अलीकडे ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेची स्टारकास्ट ‘द कपिल शर्मा शो’मध्य पोहोचली होती मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे मात्र यावेळी अनुपस्थित होते. मुकेश खन्नाद कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अखेर  मुकेश खन्ना यांनीच एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट करत या प्रश्नाचे उत्तर दिले होते. ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्याात शो आहे. येथे पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात, असे ते या ट्वीट मध्ये म्हणाले होते. अर्थात काहीच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीटही केलेत. आता त्यांच्या या टीकेला  महाभारतात युधिष्ठिराचे पात्र साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी उत्तर दिले आहे. कदाचित द्राक्ष खायला मिळाली नाहीत, म्हणून मुकेश खन्ना यांना द्राक्ष आंबट लागत आहेत, असा टोमणा त्यांनी मारला.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला. ‘कपिल शर्मा शो’ नंबर वन शो आहे. करोडो लोक हा शो बघतात आणि मुकेश खन्ना यांना हा शो वाह्यात वाटतो, ते या शोला फालतू म्हणतात. शोमध्ये पुरूष महिलांचे कपडे घालतात, यावर त्यांचा आक्षेप दिसतो. पण मग  महाभारतात काय होते? महाभारतातही अर्जुनाने स्त्रीवेश धारण केला होता. अर्जुनाची भूमिका साकारणा-या अभिनेत्यानेही स्त्रीचे कपडे घालून दृश्य दिले होते. इतकेच नाही नृत्यही केले होते. तर मग त्यांना ही मालिका करायला नको होती? त्यावेळी मुकेश खन्ना यांनी स्वत: महाभारत का सोडले नाही? मुकेश खन्ना जे काही बोलले मी त्याची निंदा करतो, असे गजेंद्र चौहान म्हणाले.आपण स्वत: ‘कपिल शर्मा शो’मध्ये गेलो नाहीत, असे मुकेश खन्ना यांनी सांगितले. पण माझ्या माहितीनुसार, त्यांना या शोमध्ये बोलवण्यात आले नव्हते, असेही गजेंद्र चौहान म्हणाले.

मुकेश खन्ना यांनी दिले उत्तर

गजेंद्र चौहान यांच्या या टीकेला मुकेश खन्ना यांनी लगेच उत्तरही दिले.  मुकेश खन्नाला कपिल शर्मा शोमध्ये बोलवलेच नव्हते, असे स्वत:ला ‘धर्मराजजी’ म्हणत आहे. आपण नेहमी सत्य बोलतो, हा भ्रम यांना आहे, शेवटी धर्मराज जे आहेत. मी तर याला अज्ञान म्हणेल. जी यांनी खूप सारे फालतू सिनेमे करून कमावली आहे, असे ट्वीट त्यांनी केले.

त्याआधी केलेल्या ट्वीटमध्ये मुकेश खन्ना यांनी गजेंद्र चौहान यांच्यावर परखड टीका केली. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, महाभारतात स्वत:ला धर्मराज म्हणणा-या अभिनेत्याचा हा अहंकार म्हणायला हवा. शो आपल्यामुळेच चालला होता, असे त्याला वाटतेय. कदाचित म्हणून जगभरातील सर्व द्राक्षे आधी त्यालाच मिळायला हवी, असे त्याला वाटतेय आणि मुकेश खन्नाला द्राक्षे मिळाली नाहीत, म्हणून त्यांना ती आंबट वाटताहेत, असे तो म्हणतोय.

एक वाह्यात शो - मुकेश खन्ना

यापूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘महाभारत’ या मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे अनुपस्थित होते. मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनी थेट मुकेश खन्ना यांनाच हा सवाल केला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुकेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट करत ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्याात शो आहे, असे म्हटले होते. अर्थात काहीच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीटही केले होते. ‘द कपिल शर्मा शो’ भलेही देशभर लोकप्रिय असले. पण मी यापेक्षा दुसरा वाहयात शो पाहिला नाही. द्विअर्थी संवाद, पांचट विनोदांशिवाय यात काहीही नाही. पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात, असे त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले होते.

यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले

किकू शारदाने केली न्यूज अँकरची नक्कल; संतापलेले नेटकरी म्हणाले, Boycott KapilSharmaShow

टॅग्स :मुकेश खन्नाद कपिल शर्मा शो