करण जोहरने टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात लिहिले आपल्या मुलांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 14:35 IST
करण जोहरने सरोगसीद्वारे या वर्षी त्याच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. करण जोहरने सोशल मीडियावरून तो जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे ...
करण जोहरने टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात लिहिले आपल्या मुलांना पत्र
करण जोहरने सरोगसीद्वारे या वर्षी त्याच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. करण जोहरने सोशल मीडियावरून तो जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे जाहीर केले होते. मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असे त्याने त्यावेळी सांगितले होते. माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांनी प्रवेश केला आहे या शब्दांत त्याने त्याचा आनंद व्यक्त केला होता. वयाच्या ४४ वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो, हे माझे सगळ्यांत मोठे ब्लॉकबस्टर आहे. सध्या सतत मी त्यांना न्याहाळत बसतो. मी दोन मुलांचा बाप झालोय, यावर माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या होत्या.फिल्ममेकर करण जोहरने नुकतेच आपली जुळी मुले यश आणि रूही यांचे फोटो तैमूर अली खानसोबत शेअर केले होते आणि इंटरनेटवर त्यांच्या गोडव्याचीच सर्वत्र चर्चा होती. टेड टॉक्स इंडिया नयी सोचचा तिसरा भाग खूप खास असणार आहे. या तिसऱ्या भागात करण जोहर हजेरी लावणार असून या कार्यक्रमात आपल्या मुलांना लिहिलेले पत्र तो वाचून दाखवणार आहे. या भागाचे टायटल चेंजिंग रिलेशनशिप्स आहे. या विषयावर बोलण्यासाठी करण जोहरपेक्षा अधिक कोणीही चांगले असू शकत नाही असे या कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे होते. करण आपल्या मुलांबाबत अतिशय जागरूक आणि प्रोटेक्टिव्ह आहे. त्याने आपल्या मुलांना पत्र लिहिण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या मंचाचा उपयोग करायचे ठरवले. “वडील बनणे हा माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही दोघांनी मला आणखी चांगले व्यक्ती बनवले आहात.” असे त्याने त्याच्या पत्रात लिहिले होते. त्याच्या या पत्राने शाहरूख खानला अक्षरशः निःशब्द केले आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्याने करणला घट्ट मिठी मारली आणि तो त्याला म्हणाला की, त्याला करणचा खूप अभिमान आहे.Also Read : करण जोहर आणि रोहित शेट्टी शोधत आहेत सामान्य लोकांमधून त्यांच्या चित्रपटासाठी कलाकार