Join us  

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, अनेक मालिका-चित्रपटात केले आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 2:17 PM

या कलाकाराने नुकताच साखरपुडा झाला असून सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. 

ठळक मुद्देअर्चनाने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असून तिच्या या मित्राचे नाव पार्थ रामनाथपूर आहे. अर्चननाने नाशिकमध्ये तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

का रे दुरावा ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आपल्याला अर्चना निपाणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अर्चनाने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच ती नुकतीच पानिपत या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची म्हणजेच आनंदीबाईची भूमिका साकारली होती. अर्चनाचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. 

अर्चनाने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असून तिच्या या मित्राचे नाव पार्थ रामनाथपूर आहे. अर्चननाने नाशिकमध्ये तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. त्यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. 

झी 24 तासाने त्यांच्या दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अर्चना आणि पार्थ यांची ओळख अकरावीत काही कॉमन मित्रांच्या माध्यमातून झाली होती. पार्थ सायन्सला तर अर्चना कॉमर्सला होती. काहीच महिन्यात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या नात्याला काही महिने झाल्यानंतर आपण या सगळ्यासाठी खूप लहान आहोत याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षं त्या दोघांचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता.

अर्चना आणि पार्थ दोघेही त्यांच्या करियरमध्ये व्यग्र झाले. अर्चनाला का रे दुरावा या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने ती मुंबईत राहायला लागली. त्याचदरम्यान पार्थ देखील कामानिमित्त मुंबईत होता. त्यावेळी ते दोघे एकमेकांना पुन्हा भेटायला लागले. त्यांनी त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. ते दोघे साडे तीन वर्षं पुन्हा नात्यात होते. पण काही कारणांनी पुन्हा त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले. पण त्यांचे एकमेकांसोबतच भविष्य आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्या दोघांनी साखरपुडा करण्याचे ठरवले. ते याच वर्षांत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन