Join us  

'आम्ही दोघी'मालिकेने पार केला २५० भागांचा टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 8:00 AM

'झी युवा'वरील विवेक सांगळे आणि खुशबू तावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आम्ही दोघी' या मालिकेने अडीचशे भागांचा टप्पा पार केला आहे

ठळक मुद्देया मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार झाला आहे.मालिकेच्या टीमने केक कापून हे यश साजरे केले

'झी युवा'वरील विवेक सांगळे आणि खुशबू तावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आम्ही दोघी' या मालिकेने अडीचशे भागांचा टप्पा पार केला आहे. मोठ्या बहिणीची धाकट्या बहिणीवर असलेली माया, कौटुंबिक जिव्हाळा अशा सगळ्याच गोष्टी या मालिकेतून पाहायला मिळतात. 

या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार झाला आहे. मालिकेने मिळवलेले हे यश, फारच धुमधडाक्यात साजरे केले गेले. पडद्यावर दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी, पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले. भूमिकेचे नाव ही आमची ओळख बनून जाते, याचा अधिक आनंद होतो असं सगळ्यांनीच आवर्जून सांगितलं. मजामस्तीच्या, हलक्याफुलक्या वातावरणात, संपूर्ण टीमने केक कापून हे यश साजरे केले. यापुढेही मालिका प्रेक्षकांना असाच आनंद देत राहील याची खात्री आहे. 

अभिनेत्री खुशबू तावडे म्हणाली; "२५० भागांचा टप्पा गाठणे, ही आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बाब आहे. हे यश मिळवण्यासाठी आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या व आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. एक कलाकार म्हणून खूप काही शिकण्याची, उत्तम अनुभव घेण्याची संधी या मालिकेमुळे आम्हाला मिळाली. आमच्या या यशात पडद्यामागच्या कलाकारांचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्यामुळेच ही मालिका एवढे मोठे यश मिळवू शकली. या सगळ्यांचे मी आज आभार मानते. हे यश सगळ्यांचे आहे, त्यामुळेच सेटवरच्या सर्वांनी मिळून केक कापला आणि हा आनंद साजरा केला."

टॅग्स :आम्ही दोघी मालिकाझी युवा