Join us

Congratulation:दिग्दर्शकासह विवाहबंधनात अडकली ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री,बघा INSIDE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:53 IST

सध्या सर्वत्रच ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे पाहायला मिळते आहे. मग त्यात मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही तरी ...

सध्या सर्वत्रच ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे पाहायला मिळते आहे. मग त्यात मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही तरी कशी मागे राहणार.नुकतेच छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर विवाहबंधनात अडकली आहे. अनिरुद्ध शिंदेसोबत  रसिका विवाहबंधनात अडकली आहे.अनिरुद्ध शिंदे हा व्यवसायाने दिग्दर्शक आहे.त्याने फ्रेशर्स मालिका दिग्दर्शित केली आहे.गेल्याच वर्षी  मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.रसिकाची 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील तिची भूमिका इतर भूमिकांप्रमाणे लक्षवेधी ठरली होती.या मालिकेमुळेच ती प्रकाशझोतात आली आणि अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली होती.आता रसिकांने आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे.अनिरुद्ध आणि रसिका यांचे हे लव्हमॅरेज आहे.गेल्या 10 वर्षापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. या लग्नसोहळ्याला अनिरूद्ध आणि रसिकाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.या फोटोंमध्ये नववधू रसिकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.साखरपुडा झाल्यापासून रसिकाच्या लग्नाचे काऊंड डाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.हा विवाहसोहळा मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने पार पडला.सिएनएक्स मस्तीला दिलेल्या मुलाखतीत रसिका आणि अनिरूद्ध यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.या नात्याविषयी अनिरुद्ध सांगतो,मी आणि रसिका कॉलेजमध्ये एकत्र होतो.त्यावेळी आम्ही दोघेही एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचो.त्याच दरम्यान आमची ओळख झाली. कॉलेजमध्ये असताना जवळजवळ दोन-तीन वर्षं मी रसिकाच्या मागे होते. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि चक्क बस स्टॉपवर मी तिला प्रपोज केले होते.गेल्या दहा वर्षांपासून आम्ही नात्यात आहोत. कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे देखील त्यावेळी आमचे ठरले नव्हते.मी एका कंपनीत सेल्स विभागात काम करत होतो. पण नंतर आम्ही दोघांनीही या क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले.गेल्या काही वर्षांत आम्ही दोघांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली आहे. स्ट्रगलच्या काळात एकमेकांना समजून घेतले आहे. मी निराश झालो तर ती नेहमीच माझ्या मागे खंबीर उभी राहाते. तिने आणि माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे.मालिकेच्या सेटवर आम्ही दोघे केवळ दिग्दर्शक आणि कलाकार एवढेच असतो. व्यवसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात आम्ही सुवर्णमध्ये साधला आहे.रसिकाच्या अभिनयात काही खटकत असेल तर एक दिग्दर्शक म्हणून मी तिला नक्कीच सांगतो. कधी तरी माझे बोलणे तिला खटकते आणि ती मला यस सर असे बोलून निघून जाते. तिने मला सर अशी हाक मारल्यानंतर तिला राग आल्याचे माझ्या लगेचच लक्षात येते. पण दृश्य झाल्यानंतर मी एखादी गोष्ट तिला का सांगितली होती हे ती मला आवर्जून विचारते. ते कारण मी तिला समजावून सांगितल्यावर तिला नेहमीच पटते. कारण दिग्दर्शक म्हणून तुम्ही केवळ एका भागाचा नाही तर पुढील अनेक भागांचा विचार करत असता. कधीकधी मी सेटवर चिडलो असेल तर तो राग तिच्यावर निघतो. पण आपण रागाच्या भरात जवळच्या व्यक्तीवरच राग काढू शकतो ही गोष्ट ती समजून घेते.या दोघांच्या नात्याविषयी रसिका सांगते, माझ्या मालिकेचा दिग्दर्शन अनिरुद्ध आहे हे कळल्यावर सुरुवातीला तर मी खूप खूश झाले होते. तो सगळे काही माझे ऐकेल असे मला वाटले होते. मात्र मालिकेच्या सेटवर अनेक वेळा आमच्या शाब्दिक बाचाबाची होतात. पण त्यातही आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो. त्यामुळे आमच्यात वाद होत नाहीत. आम्ही दोघे एकाच क्षेत्रात असल्याने आम्हाला एखाद्या प्रोजेक्टविषयी विचारण्यात आले तर सगळ्यात पहिल्यांदा एकमेकांशी चर्चा करतो.एकाच क्षेत्रात असण्याचा आम्हाला हा सगळ्यात मोठा फायदा असल्याचे रसिकाने सांगितले.