Join us  

शूटिंग सुरू असतानाच रामायणच्या सेटवर आलेला साप, जीव मुठीत घेऊन पळालेले कलाकार; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:07 PM

1 / 8
९०च्या दशकात प्रसारित झालेल्या 'रामायण' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आजही ही मालिका तितकीच लोकप्रिय आहे.
2 / 8
या मालिकेत अरुण गोविल यांनी श्री राम तर दीपिका चिखलिया यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती. सुनील लहरी लक्ष्मणाच्या भूमिकेत होते. आजही ते लोकांच्या मनात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या छबीतच आहेत.
3 / 8
रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे अनेक किस्से सांगितले जातात. पण, 'रामायण' मालिकेच्या शूटिंगदरम्यानच असा एक प्रसंग घडला होता. ज्यामुळे कलाकारांना जीव मुठीत घेऊन सेटवरुन पळ काढावा लागला होता.
4 / 8
दीपिका चिखलिया यांनी पोस्टद्वारे हा प्रसंग सांगितला होता. दीपिका यांनी रामायणाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ते तिघे एका झाडाच्या खाली शूट करत होते.
5 / 8
'या फोटोच्या मागे एक स्टोरी आहे. म्हणून मी हा फोटो शेअर केला आहे. आम्ही शूटिंगमध्ये व्यग्र होतो. सीन संपल्यानंतर आम्हाला कॅमेरामॅन अजीत नाईक यांनी झाडाखाली उभं न राहण्यास सांगितलं.'
6 / 8
'त्यांनी सेटवरुन सगळ्यांना त्या जागेवरून दूर जाण्यास सांगितलं. आम्हाला कळतच नव्हतं काय चाललंय. रामानंद सागरही हाच विचार करत होते.'
7 / 8
'त्यानंतर त्यांनी झाडावर असलेल्या सापाकडे बोट दाखवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच तिथून पळ काढला,' असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. पण, दीपिका यांनी ही पोस्ट नंतर डिलीटही केली होती.
8 / 8
२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी हजेरी लावणार आहेत.
टॅग्स :रामायणटिव्ही कलाकार