Join us  

बॉलिवूडच्या ‘या’ लग्नांवर खर्च झाला होता पाण्यासारखा पैसा, पण काहीच वर्षात मोडला संसार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 5:53 PM

1 / 7
अमृता सिंग व सैफ अली खान यांनी 1991 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. अर्थात काहीच वर्षांत हे लग्न मोडलं. 2004 मध्ये सैफ व अमृतानं घटस्फोट घेतला.
2 / 7
साऊथस्टार सामंथा रूथ प्रभू व नागा चैतन्य यांनी 2017 साली गोव्यात लग्नगाठ बांधली होती. या लग्नाचा शाही थाट पाहून अनेकांचे डोळे दिपले होते. पण हे लग्न फक्त 4 वर्ष टिकलं. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यांत सामंथा व नागा यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलं.
3 / 7
हृतिक रोशन व सुजैन खान यांच्या लग्नाचा थाटही बघण्यासारखा होता. 14 वर्ष संसार सुखात चालला होता. पण अचानक मतभेद वाढले आणि दोघांचा घटस्फोट झाला.
4 / 7
मनीषा कोईराला हिने 19 जून 2010 साली नेपाळचा बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नावर करोडो रूपयांचा खर्च झाला होता. पण लग्न होऊन दोनच वर्ष होत नाही तो दोघांचा घटस्फोट झाला.
5 / 7
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 साली बिझनेसमॅन संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. अगदी थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. 2014 मध्ये करिश्मा व संजयने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि 2016 मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता.
6 / 7
आमिर खानचा भाचा इमरान खानने 10 जानेवारी 2011 रोजी अवंतिका मलिक हिच्यासोबत थाटात लग्न केलं होतं. असं म्हणतात की, या लग्नावर 6 कोटींचा खर्च झाला होता. 2019 मध्ये हे कपल विभक्त झालं.
7 / 7
अभिनेत्री व मॉडेल डिंपी गांगुलीने 2010 मध्ये राहुल महाजनसोबत लग्नगाठ बांधली होती. शाही थाटात हे लग्न पार पडलं होतं. पण नंतर 2015 मध्ये डिंपी व राहुलचा घटस्फोट झाला होता.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी