Join us  

बॉलिवूड अभिनेत्रीचे ठरलेले लग्न मोडले, वर्षभरानंतर केला यावर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 7:33 PM

1 / 11
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात.कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत.
2 / 11
मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते महक चहल आणि अश्मित पटेल यांचं.
3 / 11
दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला.
4 / 11
आता ते लग्न कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच दोघांनी साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले .यानंतर दोघांनीही यावर बोलणे टाळले होते.
5 / 11
शेवटी दिलेल्या एका मुलाखतीत महक चहलने याबाबत खुलासा केला आहे. खरंतर इतका मोठा निर्णय घेणे खरंच खूप कठीण होतं.
6 / 11
पण जेव्हा आपण एकमेकांसोबत राहायला लागतो तेव्हाच आपल्याला समोरच्या माणसाचे खरे गुण कळतात. त्याच दरम्यान जाणवले की,अश्मित माझ्यासाठी योग्य पार्टनर नाही.
7 / 11
लग्नानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा मी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यामुळे शेवटी लग्न न करणे हाच चांगला पर्याय होता.
8 / 11
आमच्या ब्रेकअपनतर मी वर्षभर गोव्यातच राहिले. यातून सावरल्यानंतर आता मी पुन्हा मुंबईत आले आहे.
9 / 11
महक चहल आता सगळे काही विसरुन 'खरतरों के खिलाडी ११' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
10 / 11
महक चहल हिने दबंग सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमातही काम केले आहे.
11 / 11
याशिवाय बिग बॉस सीझन पाचमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील कवच या मालिकेतही तिने काम केले आहे.
टॅग्स :सलमान खानबिग बॉस