Join us  

काय सांगता? अभिषेक बच्चनला रोज रात्री झोपण्यापूर्वी मागावी लागते ऐश्वर्याची माफी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 1:08 PM

1 / 8
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडचं एक लोकप्रिय कपल. लग्नाला 14 वर्ष झालीत पण दोघांमधील बॉन्डिंग आजही तितकंच मजबूत आहेत.
2 / 8
नाही म्हणायला सामान्य जोडप्यात होतात तशी भांडणं त्यांच्यातही होतात. पण हे भांडण कधीही विकोपाला गेलं नाही. अर्थात यामागे एक मोठ्ठ सीक्रेट आहेत.
3 / 8
होय, एका मुलाखतीत दोघांनीही हे सीक्रेट उघड केलं आणि ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
4 / 8
होय, रोज रात्री झोपण्यापूर्वी अभिषेक ऐश्वर्याची माफी मागतो. यामुळे गेल्या 14 वर्षांपासून दोघांचाही संसार अगदी सुखात सुरू आहे.
5 / 8
अभिषेक यावर म्हणाला, सामान्य कपलमध्ये होतात तशी भांडण आमच्यातही होतात. पण अशी भांडण नसतील तर संसारात मज्जा ती काय?
6 / 8
आमची भांडणं कधीच विकोपाला जात नाही. याचं कारण म्हणजे आम्ही दोघांनी भांडण करून झोपायचं नाही, असं ठरवलं आहे. म्हणून मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐश्वर्याची माफी मागतो, असं अभिषेक म्हणाला.
7 / 8
तसंही स्त्रिया आपली चूक कधीचं मान्य करत नाहीत, त्यामुळे अनेक भाडणांमध्ये पुरूषाला माफी आणि माघार घ्यावी लागते..., असंही हसत हसत त्यानं सांगितलं.
8 / 8
ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन