Join us  

सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायला बसला खूप फटका, गमावल्या या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:32 PM

1 / 7
''कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. ''या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही
2 / 7
कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान आणि ऐश्वर्याबाबत.
3 / 7
सलमानचा स्वभाव या नात्यामध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. ऐश्वर्या सलमानपासून वेगळी झाली खरी. पण, तिला बऱ्याच गोष्टींचा नाहक त्रास झाला.
4 / 7
सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा 'चलते चलते' या चित्रपटाचंही नाव पुढे येते. या चित्रपटाच्या सेटवर सलमानने गोंधळ केला होता. शाहरुख खानशीही त्याचे यादरम्यान मतभेद झाले होते.
5 / 7
परिणामी ऐश्वर्याचा चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली.
6 / 7
सलमान खानशी झालेल्या ब्रेअकपनंतर ऐश्वर्या राय अनेक मोठ्या चित्रपटांना मुकली होती.
7 / 7
एकेकाळी यशशिखरावर असणाऱ्या ऐश्वर्याला या नात्यामुळे पुढे आपल्याहून नवोदीत कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर करावी लागली होती.
टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनशाहरुख खान